अगदी दोन दिवसांपूर्वीपर्यंत उकडत होते. रोज ढग येत होते आणि न बरसताच परत जात होते. शेवटी "येतोय येतोय" म्हणता म्हणता काल पाऊस खराच आला. मातीचा वास सगळीकडे पसरला. हवा थंड झाली. ओले रस्ते, ओली झाडे, पावसाळी हवा! नेहमीच हवाहवासा वाटणारा पहिला पाऊस बंगलोरला दाखल झाला.
आज सकाळी कॅबने कामाला जाताना बाहेर असेच पावसाळी वातावरण होते. खिडकीतून बाहेर पाहता पाहता मन भूतकाळात पोचले. गेले एकदम शाळेच्या दिवसांत.
शाळेची आणि पावसाची सुरवात तशी एकत्रच व्हायची. शाळा सुरु होणार म्हणल्यावर अभ्यासाच्या साहित्याची खरेदी व्हायची. पुस्तके, दप्तरे ह्यांसोबत रेनकोटचीही खरेदी व्हायची. नव्या कोऱ्या वह्या-पुस्तकांचा, दप्तराचा वास....पावसाने हवेला आलेला ओलसरपणा...सकाळची शाळा..शाळेत येता येता पावसात हलकेसे भिजल्याने वाजणारी थंडी...ओली दप्तरे, ओली बाके...मोठ्या सुट्टीनंतर भेटलेल्या मित्र-मैत्रिणींशी खूप दिवसांनी मारलेल्या गप्पा...सगळे काही पावसाळी वातावरणात चिंब भिजलेले.
प्रत्येक विषयाच्या सगळ्यात पहिल्या तासाच्या सुरवातीला वहीवर नाव घालणे, श्री लिहिणे...वर्गशिक्षक कोण असणार, कोणत्या विषयाला कोणते शिक्षक असणार अशा प्रश्नांनी तयार झालेला सस्पेन्स...प्रत्येक विषयाला कोणते धडे असतील, काय काय शिकावे लागेल ह्याची लागलेली उत्सुकता...आजही हे सगळे जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहते.
आज सकाळी कॅबने कामाला जाताना बाहेर असेच पावसाळी वातावरण होते. खिडकीतून बाहेर पाहता पाहता मन भूतकाळात पोचले. गेले एकदम शाळेच्या दिवसांत.
शाळेची आणि पावसाची सुरवात तशी एकत्रच व्हायची. शाळा सुरु होणार म्हणल्यावर अभ्यासाच्या साहित्याची खरेदी व्हायची. पुस्तके, दप्तरे ह्यांसोबत रेनकोटचीही खरेदी व्हायची. नव्या कोऱ्या वह्या-पुस्तकांचा, दप्तराचा वास....पावसाने हवेला आलेला ओलसरपणा...सकाळची शाळा..शाळेत येता येता पावसात हलकेसे भिजल्याने वाजणारी थंडी...ओली दप्तरे, ओली बाके...मोठ्या सुट्टीनंतर भेटलेल्या मित्र-मैत्रिणींशी खूप दिवसांनी मारलेल्या गप्पा...सगळे काही पावसाळी वातावरणात चिंब भिजलेले.
प्रत्येक विषयाच्या सगळ्यात पहिल्या तासाच्या सुरवातीला वहीवर नाव घालणे, श्री लिहिणे...वर्गशिक्षक कोण असणार, कोणत्या विषयाला कोणते शिक्षक असणार अशा प्रश्नांनी तयार झालेला सस्पेन्स...प्रत्येक विषयाला कोणते धडे असतील, काय काय शिकावे लागेल ह्याची लागलेली उत्सुकता...आजही हे सगळे जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहते.
प्रत्येक विषयाचे पहिले काही धडे तर जणू पावसातच भिजलेले असायचे. बाई शिकवत असायच्या आणि मागे पाऊस नेपथ्य आणि पार्श्वसंगीत द्यायचा. परीक्षेच्या वेळी अभ्यास करताना हे धडे पुन्हा उघडले की जणू काही पाऊसच पडतोय असा फील यायचा. किंबहुना अजूनही काही धड्यांची, मुख्यतः मराठीच्या, आठवण आली की सोबत पावसाचा फील येतो.
शाळेत जाताना किंवा येताना पाऊस पडत असेल तर रिक्षावाले काका रिक्षेचे पडदे खाली सोडायचे. पडदे असूनही सगळ्यात कडेला बसणारी मुले तर ओली व्हायचीच . जी आत बसलेली असतील तीही बाकी भिजलेल्या मुलांमुळे, ओल्या दप्तरांमुळे ओली व्हायची. पुस्तकांनाही प्लास्टिकच्या पिशवीचा रेनकोट घालायला लागायचा. सगळे काही पाऊसमय!
पावसामुळे संध्याकाळी बऱ्याचदा पार्किंगमध्येच खेळायला लागायचे. त्यामुळे भेंड्या, दम शराझ असले इनडोअर खेळ खेळण्यात समाधान मानावे लागायचे. कधी कधी मात्र भर पावसात पळापळीचे खेळही खेळायला मजा यायची. कधी बिल्डींगसमोर साचलेल्या डबक्यात होड्या करून सोडण्याचे उद्योग चालायचे. एकदा एका मुलाच्या काय डोक्यात आले, त्याने डबक्यातली गांडुळे पकडून बाटलीत भरून ठेवण्याचा उद्योग चालू केला. तशी सरपटणार्या प्राण्यांची मला येते किळस पण तेव्हा कसे कोण जाणे धैर्य करून एक गांडूळ मीही हातात धरून बाटलीत टाकले. एकानंतर दुसरा, दुसर्यानंतर तिसरा, म्हणता म्हणता गांडुळे पकडून बाटलीत भरून ठेवण्याचा छंदच सगळ्यांना लागला. तो प्रकार आम्हाला अगदी कंटाळा येईस्तोवर आम्ही केला.
पुढे सायकलने शाळेत जाऊ लागल्यावर मात्र आपण घरी येत-जात असताना पाऊस पडण्यापेक्षा बाकी वेळी पाऊस पडावा असे वाटू लागले. रेनकोट वगरे घातले तरी भिजायला व्हायचेच, बूट मोजे हमखास भिजायचेच. आणि मग दिवसभर तसेच भिजलेले बसायला अगदी नकोसे वाटायचे.
असाच हा पावसाळा चालू असताना यायचा श्रावण! श्रावण म्हणले की घरात वेगवेगळी व्रत-वैखाल्ये, पूजा, सण-वार चालू व्हायचे. पक्वान्ने तयार व्हायची. हाताला मेहंदी लागायची. एका हातात छत्री धरून पूजेला लागणारी फुले गोळा करायचे काम तसे कसरतीचे वाटायचे. अत्तर-उद्बात्यांच्या, पक्वान्नांच्या, मेहंदीच्या सुवासात मातीच्या आणि फुलांच्या सुगंधाची भर घालून पाऊसही आमच्या आनंदात शामिल व्हायचा.
तोतापुरी आंबे, भाजलेली कणसे, गरमा-गरम भजी, वाफाळलेले सूप आणि ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीला पाऊस!!! कल्पनेनेच किती मस्त वाटते. एखाद्या ढगाळ संध्याकाळी, उबदार गादीवर बसून, एकीकडे पुस्तक वाचत, भुरक्या मारत प्यायलेले सूप; बाहेर धो धो पाऊस चालू असताना, अंग भिजल्याने कुडकुडत, सिंहगडवरल्या झोपडीत बसून खाल्लेल्या झुणका-भाकरीची, आणि कांदा भाजीची चव; बाहेर पाऊस पडत असताना बाल्कनीत बसून मिटक्या मारत खाल्लेल्या तोतापुरी आंब्याच्या फोडी; ह्या सगळ्यातून मिळालेला आनंद कितीही पैसे मोजले तरी न मिळणारा!
पुढे कॉलेजमध्ये पावसाने मजा आणली ती बी. सी. वर! लेक्चर्स संपली की मस्त बी. सी. वर जाऊन बसायचे. बी. सी. वरच्या झाडांवरून पाणी टप-टप ओघळत असायचे. पलीकडे वाहणाऱ्या नदीत पडणाऱ्या थेंबांनी पाण्यात तरंग उठायचे. अशा चिंब वातावरणात चहा-कॉफी पीत, गप्पा मारत तास-दोन तास कसे सरायचे कळायचे नाही.
पुढे आय. आय. टी. त गेल्यावर पावसाचे वेगळे रूप पाहिले. डोक्यावर बादली ओतल्यासारखा पाऊस अक्षरशः कोसळत असायचा. एकदा आला की जाण्याचे नाव नाही, २-३ दिवस सलग पडत राहायचा. छत्री फक्त हवी म्हणून न्यायची. छत्रीचा उपयोग शून्य होता. तसेच अर्धवट भिजून लेक्चरला जाऊन बसायचे, मग कामासाठी lab मध्येही तसेच ओले बसायचे. सगळी नुसती चिक-चिक! पण cafe shack च्या समोरच्या पायऱ्यांवर बसून गरमा-गरम maggi noodles आणि सूप खायला जी काही मजा यायची त्याला काही तोड नाही! पाऊस पडत असताना लक्ष्मीत बसून आधी मंचाव सूप, मसाला पापड आणि नंतर डाल-खिचडी खायला फार भारी वाटायचे.
बंगलोरमध्ये पाऊस तसा प्लेझंट असतो. खूप धो-धो वगरे पडत नाही. पण साधारणपणे वर्षातील दहा महिने पडत असल्याने "अतिपरिचयात् अवज्ञा" अशी तऱ्हा झाली आहे. पण सध्या इतर भागात कडकडीत उन्हाळा चालू असताना बंगलोरमध्ये मात्र मस्त हवामान आहे, एकदम रोमॅंटिक म्हणतात तसे! रिमझिम पावसात मस्त सूप, भजी, किंवा गरमा-गरम पॉप कॉर्न खात बाल्कनीत खुर्ची टाकून बाहेर बघत बसावे असे. त्यामुळे मी आता ही पोस्ट थांबवते आणि मागचे वाक्य सत्यात आणते. पुणे आणि इतर ज्या ठिकाणी उन्हाळा चालू आहे त्या सर्वांना टुक-टुक!!
पुढे कॉलेजमध्ये पावसाने मजा आणली ती बी. सी. वर! लेक्चर्स संपली की मस्त बी. सी. वर जाऊन बसायचे. बी. सी. वरच्या झाडांवरून पाणी टप-टप ओघळत असायचे. पलीकडे वाहणाऱ्या नदीत पडणाऱ्या थेंबांनी पाण्यात तरंग उठायचे. अशा चिंब वातावरणात चहा-कॉफी पीत, गप्पा मारत तास-दोन तास कसे सरायचे कळायचे नाही.
पुढे आय. आय. टी. त गेल्यावर पावसाचे वेगळे रूप पाहिले. डोक्यावर बादली ओतल्यासारखा पाऊस अक्षरशः कोसळत असायचा. एकदा आला की जाण्याचे नाव नाही, २-३ दिवस सलग पडत राहायचा. छत्री फक्त हवी म्हणून न्यायची. छत्रीचा उपयोग शून्य होता. तसेच अर्धवट भिजून लेक्चरला जाऊन बसायचे, मग कामासाठी lab मध्येही तसेच ओले बसायचे. सगळी नुसती चिक-चिक! पण cafe shack च्या समोरच्या पायऱ्यांवर बसून गरमा-गरम maggi noodles आणि सूप खायला जी काही मजा यायची त्याला काही तोड नाही! पाऊस पडत असताना लक्ष्मीत बसून आधी मंचाव सूप, मसाला पापड आणि नंतर डाल-खिचडी खायला फार भारी वाटायचे.
बंगलोरमध्ये पाऊस तसा प्लेझंट असतो. खूप धो-धो वगरे पडत नाही. पण साधारणपणे वर्षातील दहा महिने पडत असल्याने "अतिपरिचयात् अवज्ञा" अशी तऱ्हा झाली आहे. पण सध्या इतर भागात कडकडीत उन्हाळा चालू असताना बंगलोरमध्ये मात्र मस्त हवामान आहे, एकदम रोमॅंटिक म्हणतात तसे! रिमझिम पावसात मस्त सूप, भजी, किंवा गरमा-गरम पॉप कॉर्न खात बाल्कनीत खुर्ची टाकून बाहेर बघत बसावे असे. त्यामुळे मी आता ही पोस्ट थांबवते आणि मागचे वाक्य सत्यात आणते. पुणे आणि इतर ज्या ठिकाणी उन्हाळा चालू आहे त्या सर्वांना टुक-टुक!!