Thursday, December 23, 2010

गप्पा पुस्तकांविषयीच्या

खूप दिवस झाले पोस्ट लिहून...मधले दिवस मी काही interesting पुस्तके वाचण्यात मग्न होते...रविंद्रनाथ टागोरांचे गोरा आणि इंदिरा गांधींचे चरित्र (लेखिका: पुपुल जयकर) ही त्यातली दोन...पुस्तके खूपच छान होती...
'गोरा' ही स्वातंत्र्योत्तर भारतातील समाजव्यवस्थेविषयीचे अनेक पैलू उलगडत जाणारी कथा आहे. गोरा व त्याचा मित्र बिनोय ह्यांच्या आयुष्यात घडत जाणार्या घटनांमधून रविन्द्रनाथ हा क्लिष्ट विषय अतिशय मनोरंजकपणे मांडत जातात.
इंदिरा गांधीच्या चरित्राचे पानन पान त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अद्भूत घटनांनी थकक करून सोडते. शाळेत शिकवतात फ़क्त स्वातंत्र्यापर्यंतचा इतिहास...त्यानंतर भारतात काय काय घडले हे माझ्या वयाच्या लोकांना क्वचितच माहीत असते. इंदिरा गांधींच्या चरित्रात स्वतंत्र्यापूर्वीचा काही काळ आणि स्वातान्त्र्यानंतरचा ३०-४० वर्षांचा काळ आपल्यासमोर उभा राहतो. स्वातंत्र्योत्तर भारतापुढील समस्यांची तीव्रता स्वातंत्र्योत्तर भारतापुढील समस्यान्हून तीळमात्रही कमी नव्हती. पैशाची टंचाई, बेरोजगारी, महागाई, जातीवाद, गुन्हेगारी, स्मगलिंग...एक ना अनेक संकटे...त्यात पकिस्तान, त्याची बाजू घेऊन चीन आणि अमेरिका ह्यांनी नव्याने सुरु केलेला छळ...भारताने साजरे केलेले स्वातंत्र्य दिवस जस-जसे संख्येने वाढू लागले तस-तसे ह्या संकटांची तीव्रताही वाढू लागली. न अशातच नेहरूंनंतर इंदिरा पंतप्रधान झाली. मुळात एक स्त्री, वयाने लहान...आपण हिचा वापर करून भारताचा कारभार आपल्या हातात घेऊ (तिला manipulate करू) अशी कांग्रेसच्या दिग्गजान्नी पाहिलेली स्वप्न तिने धुळीस मिळवली. इतर राष्ट्रांमध्ये भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. महिला आणि मुलांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले. केवळ आर्थिक आणि सामाजिक विकासाच नाही, कला आणि साहित्य ह्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी देशात व देशाबाहेर अनेक उपक्रम आयोजित केले. तिने चुकाही केल्या. पण चुकांची जबाबदारी स्वतःवर घेऊन त्याचे प्रायश्चित्तही घेतले (तिची हत्त्या हाही त्याचाच एक भाग होता का? सुवर्ण मंदिरावर कारवाई केल्याने शिखांचा रोष तिने ओढवून घेतला. त्यानंतर तिच्या सुरक्षादलातील शिखांपासून तिला धोका आहे असे रिपोर्ट आले असतानाही तिने त्यांच्या भावना अजून दुखावून जाऊ नयेत म्हणून त्यांना काढले नाही. न त्यातीलच दोन शिखान्नी तिची हत्त्या केली.) राष्ट्रीय समस्या आणि कौटुम्बिक समस्यान्नी घेरले असतानाही तिने कधी धैर्य सोडले नाही आणि शेवटपर्यंत लढा देत राहिली. कोणी माणूस इतका खंबीर, दक्ष, efficient कसा असू शकतो असा प्रश्न तिचे चरित्र वाचताना पानो-पानी डोकावत राहतो. अर्थात मी काही इतिहासाची अभ्यासक नाही. पण पुपुल जयकरान्च्या perspective ने पाहिलेली इंदिरा गांधी माझ्या मनात देशप्रेम, जागरूकता, निर्भिड़ता ह्यांविषयीची एक नवी जाणीव करून गेली...
माझ्या शेवटच्या पोस्टनंतर माझी आणि अभिजीतची केरळमधील वायनाडला bike-trip झाली. वायनाड खूप मस्त आहे...ह्या ट्रिप विषयी लिहायची इच्छा आहे...पण त्याविषयी सविस्तर लिहिन पुढच्या पोस्टमध्ये....
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...हे वर्ष आपल्या सर्वांना आणि आपल्या भारताला भरभराटीचे जावो ही प्रार्थना...