Monday, August 16, 2010

रविवारची कहाणी

गेला रविवार एकदम मस्त गेला होता न त्याबद्दल मला लिहायचेसुद्धा होते पण "ब्रेक के बाद" असे म्हणून जे गेले ते परत ब्लॉगकडे वळायला एक आठवडा गेला न मला जे लिहायचे होते तेच मी विसरून गेले...असो...आजचा दिवस म्हणजे रविवार ही काही कमी happening नव्हता....म्हणले गेल्या रविवारची नाही तर आल्या रविवारची कहाणी तरी लोकांना सांगावीच! (टिप: मी एक सामान्य मुलगी असल्याने माझ्या जीवनात अमिताभच्या शोले, बागबान, सरकार, अजूबा आदी पिक्चरसारखे अद्भुत-रम्य असे काही घडत नाही...अमोल पालेकरच्या चितचोर, हम दोनों, बातों बातों में ह्या पिक्चर्ससारखे माझे आयुष्यही हलके-फुलकेच...नवीन सांगण्यासारखे त्यात काही नाही...तरी देवाने फुकटात काहीतरी खरडायची न लोकांपर्यंत पोहोचवायची सोय केल्याने मी लिहिते...तेव्हा तुम्हाला वैताग आल्यास क्षमस्व...)...असो...गाड़ी रुळावर आणली नाही तर पोस्ट रविवारची न संगता भलतीच कहाणी सांगेल...जाते थे जापान पोहोंच गए चीन समझ गए ना अशी गत होईल...तर सकाळी उठले न एकदम क्लिक झाले की आज स्वातंत्र्य दिवस! शाळेतले दिवस आठवले...सकाळी लवकर उठून आवरून शाळेत जायचो...झेंडावंदन करायचो...त्यावेळी सगळ्यांनी मिळून एका आवाजात, एका सुरात म्हणलेली प्रतिद्न्या, राष्ट्रगीत, देशाभाक्तिपर गीते आजही माझ्या कानांत घुमतात...माग काही कार्यक्रम व्हायचे (जे मला आवडायचे नाहीत त्यामुळे ग्राउंडवरच्या धुळीशी, मैत्रिणीच्या वेणीशी, स्वेटरच्या फुलांशी करत बसलेले खेळ अजूनही आठवतात...)कार्यक्रम संपले की एकदम पळत सुटायचो...अंगात एक चैतन्य संचारलेले असायचे...सोसायटीतले झेंडावंदन असायचेच...पार्ले-जीचा पुडा मिळायचा ते झाले की...ण माग खेळाच्या स्पर्धा...घरी आल्यावर टीवीवर लागलेले कार्यक्रम...miss those days! आज ह्यातले काहीच नव्हते...in fact ह्यातले काहीच नसण्याची सवय झालीये...उठले टीवी लावला...कर्मा लागला होता...
हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए |
दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए ||
"ओळी ऐकण्यापुरत्याच राहिल्या आहेत नाही आपल्यासाठी!", मनात विचार आला...अजून थोडा विचार केला...आपल्या आजूबाजूच्या गरजू लोकांना मदत करून, अन्धश्रद्धांचा त्याग करून, लाच न देऊन, वाहतुकीचे नियम पाळून , कर भरून आपण खारीचा काही होईना वाटा उचलत आलोय आणि उचलत राहू असे डोक्यात येऊन मनाला थोडेतरी बरे वाटले...इतक्यात खालून ढोलाचा आवाज आला...पळत पळत passage मध्ये गेले...जवळच्या शाळेतल्या मुलांची परेड चालली होती...आवाज ऐकून अभिजीतही आला...५ मिनिटे थाम्बून परेड पाहिली...न दिवसाला सुरवात केली...
रविवारची सकाळ...नाश्ता काय करावा? पुदिन्याची चटणी केली...चटणी सॅंडविच खाल्ली, ब्रेडला तोप लावून त्यावर साखर पेरून खाल्ली आणि गोडमिट्ट कॉफीत ब्रेड बुडवून खाल्ला...मजा आली!
आवरून सुरभीकडे गेलो...गेल्याच आठवड्यात तिची आई आलेली...त्यांच्या हातचा दाण्याचा लाडू खायला मिळाला...आईचे घर सोडले की ह्या गोष्टींची किम्मत काय ते कळते! खूप छान वाटले...मग गेलो केतकीकडे...मी, केतकी, तानपुरा न तबला मशीन, सोबतीला यमन...वाह...एक तास कसा गेला कळलेच नाही....मग केतकी आम्हाला "स्मोकिंग चूल्हा" मध्ये जेवायला घेऊन गेली...नावावर जाओ नका...अतिशय साढ़े, घरगुती न रुचकर असे जेवण होते...पुलाव, दाल, फुलके, बटाट्याची भाजी...सोबतीला मसाला ताक...वाह...इतक्यांदा "वाह वाह" करायला ही काही "ताजमहल चाय"ची जाहिरात नाही न मला भेटायला झाकिर हुसेन येणार नाहिये हे माहिती आहे मला...पण tasty खायला मिळाले की तोंडातून अशी दाद येणारच! असो...
पुढचा कार्यक्रम होता "पीपली लाइव्ह" पाहायचा...शो ३ चा होता...आत्ताशी १ वाजला होता...घरी जाऊ, मशीन ठेऊ न पुढे जाऊ असे ठरवले होते त्याप्रमाणे निघालो...management च्या planning and execution चे धड़े पावासानेही घेतलेत की काय कोण जाणे...आम्ही रस्त्यावर पाऊल टाकले न पावसाने पडायला सुरवात केली...पाऊस जोरात नव्हता तेव्हा पुढे टाकलेले पाऊल तसेच आणखी पुढे रेटले...आम्ही जसजसे पुढे जाओ लागलो तसतसे पावसाला अजूनच चेव चढू लागला....थांबणे भाग होते...जिथे थांबलो तिथेच समोर जूसचे दुकान होते...लगेच "chance pe dance" करावा तसे आम्ही दुकानात शिरलो...मेनू कार्ड उघडले..."1 pomegranate juice" ऑर्डर दिली...टीवी चालू होता..."तारे जमीं पर" लागला होता...बाहेर पाऊस, हातात डाळीम्बाचे जूस, टीवी वर "तारे जमीं पर"....मैफिल चांगलीच रंगली...अधून मधून बाहेर लक्ष जात होते..."आपल्याला भाव देत नाही म्हणजे काय!" असा विचार करूनच की काय पाऊस वाढतच चालला होता...पण मैफिल सोडायला मन तयार नव्हते...दुर्लक्षच झाले...तेवढ्यात डिश टीवी चा सिग्नल गेला...आता मात्र पावासाकडे डोळे लागले (तो येण्यासाठी नव्हे तर थांबण्यासाठी...) पण आधी न दिलेल्या भावाचा बदला घ्यायचा म्हणून तोही वाढतच चालला होता...असे करत करत २ वाजले...आता मात्र निघायलाच हवे होते...अभिजीतला म्हणले "चाल जाउया तसेच! पावसात भिजायला मजा येईल..." आम्ही निघालो...पावसाला ठेंगा दाखवून आम्ही तसेच निघालो...केवढी थंडी वाजत होती...तिला ignore करण्यासाठी तोंडातून वेगवेगळे आवाज काढत निघालो...आम्ही पुढे गेल्यावर लक्षात आले की पुढच्या area त विशेष पाऊस पडलेला नव्हता न आत्ताही अतिशय थोडा पडत होता...चला सुटलो असे म्हणून गाडी हाणली न घरी पोचलो (पण आम्हाला काय माहीत रुसलेला पाऊस आमचा पाठलाग करत आमच्या मागेच येत होता...)...२.१५ ला घरी पोचलो...कपडे बदलले ...२.३५ ला बाहेर पडलो...पाहतो तर काय परत पाऊस! पण आता आमच्याकडे रेनकोट होते...परत निघालो थेटरच्या दिशेने...जवळ जवळ १० मिनिटांचा रस्ता पटापट कापला...साधारण १ की.मी. च अंतर उरले होते..."आपण वेळेत पोचणार" असे म्हणेस्तोवर समोर ट्राफिक दिसले...बेंगलोरचे ट्राफिक म्हणजे काट असते ते इथे ययूनाच अनुभवावे...२.४५ वाजले होते...आता अर्धा तासाच्या आत काही आम्ही थेटरला पोचत नाही अशी चिन्हे दिसू लागली...आधीच तो "पीपली लाइव्ह" १.३० तासांचा त्यात आपण १५ मिनिटे उशिरा गेलो तर "अब बचा क्या?" अशी म्हणायची वेळ येणार हे स्पष्ट दिसू लागले...ह्याच चिंतनात १० मिनिटे गेली...इतक्यात ट्राफिक अचानक
क्लिअर झाले...श्रीकृष्णास वासुदेव नदीपार नेत असताना पुराचे पाणी अचानक बाजुला गेले होते तसाच दैवी चमत्कार होउन समोरचे ट्राफिक अचानक क्लेअर झाले...आता आम्हाला काही रस्त्यातून पुढे जाऊन कन्सवधासारखे महत्त्वाचे काम करायचे नव्हते...पण फ़क्त कल्याणकारी कामांच्या वेळीच घडवून आणण्यासाठी जर देवाने चमत्कार राखून ठेवले तर आजच्या जगात तोच बिचारा frustrate होईल...थोडक्यात काय तर चमत्कार व्हावा तसे ट्राफिक क्लेअर झाले...बरोब्बर ३ च्या ठोक्याला आम्ही थेटरात पाऊल टाकले...पुढचा १.३० तास डोळ्यापुढे जे काही घडले ते कमाल होते...."पीपली लाइव्ह" हा एक सुंदर पिक्चर आहे...रिपोर्टर्सची थट्टा अनेक पिक्चर्समधून उडवली जाते...राजकारण्यान्चा नालायकपणा अनेक पिक्चर्स दाखवतात...पण ह्या दोन्हींचा एकत्रित परिणाम किती अनापेक्षित होऊ शकतो त्याचा ह्या पिक्चरने दिलेला पञ्च हृदयावर घाव सोडून जातो...
पीपली लाइव्ह संपून निघालो...भूक लागली होती...मोकामध्ये "chocolate fondue" नामक प्रकार खाल्ला (ठीक ठाकच होता...) क्रीम, चोकोलेटचा (कधी नाव्हे तो) overdose झाला...ह्यावर उतारा काय? पाणीपुरी! वाटेत पाणीपुरी खाल्ली..सोबत मसाला पुरी मिळाली...जीभ धन्य झाली...घरी आलो...शांत बसलो..."आपले उद्या joining आहे!" मन म्हणाले..."अरे देवा! सगळ्या documents जागेवर आहेत का..." काय काय न्यायचेय ते पाहण्यासाठी offer letter उघडले...अनेक कागदांच्या zerox हव्या आहेत असे दिसले...परत घराबाहेर पडलो न घेऊन आलो...तेवढ्यात येता येता मराठी गाण्यांचा विषय निघाला...घरी आल्या आल्या laptop चालू केला गेला...ती गेली तेव्हा रिमझिम, तू तेव्हा तशी, सुरमई श्याम, जिवलगा, श्याम सुंदर राजसा, नाविका रे, पाखरा जा दूर देशी, माझे रानी माझे मोगा, गोमू संगतीन एकातून एक अनेक गाणी आठवत गेली तशी ऐकत गेलो...दिवसाचा शेवट सुरेख झाला...
ह्या दिवसाची आठवन म्हणून पोस्ट लिहायला घेतली अणि अशा प्रकारे रविवारचा दिवस सुखात गेला...जसा पाऊस आमच्यावर कोपला तसा तुमच्यावर न कोपो. तरी जसा आमचा हा रविवार मस्त गेला तसा तुमचा पुढचा प्रत्येक रविवार जाओ. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफल सम्पूर्ण! (मला ह्या वाक्याचा नीट अर्थ माहीत नाही तरी जुन्या काहण्यान्च्या style ची ही केलेली नक्कल...तेव्हा काही चूक झालेली असल्यास क्षमा असावी.)

1 comment:

  1. मुग्धा,

    तुझं लिखाण खूप नैसर्गिक आहे. direct दिल से म्हणतात तसं, खूप आवडला लेख. असच लिहित जा. तुझ्या रविवार सारखा प्रत्येक दिवस असाच स्वच्छंदी जगायला मिळाला तर! तो सुदिन :)

    -आलोक

    ReplyDelete