Monday, August 9, 2010

एक उनाड दिवस...

बंगलोरला आल्यावर हा पाहिला वीकेंड होता ज्यात माझ्या न अभिजीतच्या जिवाला थोड़ी शांतता होती...नाहीतर नवा संसार म्हणजे सामन आणा, भाजी आणा, फ्रिज आणा, फर्नीचर आणा...लिस्ट कधी संपेल की नाही अशी शंका वाटायला लागली होती...असो...तर एकदाचा ज़रा शांतता असलेला वीकेंड मिळाला...
शनिवारी सकाळी जेवायला पंजाबी पद्धतीचे काहीतरी करावे असे सर्वानुमते (म्हणजे माझ्या अणि अभिजीतच्या मते) ठरले...उषा पुरोहितांचे पुस्तक शेल्फतून बाहेर निघाले..त्यावरची शूल झटकली गेली...दिलेल्या रेसिपीज आणि घरात असलेले सामान ह्यांचा अंदाज घेऊन ज्या रेसिपीसाठी लागणार्या वस्तू घरात आहेत तो पदार्थ करायचे ठरले...डीटेल्ड अभ्यास केला गेला आणि "मसाला गोबी आणि लाछा पराठा" करायचे असे ठरले...पुरोहित बाईंच्या आणि देवाच्या कृपेने दोन्ही पदार्थ खूप छान झाले...देवाची कृपा ह्यासाठी की पुरोहित बाईंची रेसिपी कितीही चांगली असेल तरी मसाले आणि मीठ ह्यांचे प्रमाण योग्य होण्यासाठी अजूनही मला ईश्वरी मर्जीवर अवलंबून रहावे लागते...असो...जेवण मस्त झाले...
दुपारी आमच्या मित्रपरिवारासोबत पत्ते खेळण्याचा कार्यक्रम ठरवला गेला...जजमेंटचे डाव मस्त रंगले...१३ डाव खेळल्यावर मात्र आता पोटोबाचाही काही विचार करायला पाहिजे अशी जाणीव आम्हाला झाली...A2B मध्ये गेलो....१४ इडल्या (घाबरू नका...ही एकच डिश असते आणि तिच्यात १४ छोट्या छोट्या इडल्या साम्बारात बुडवून दिलेल्या असतात), समोसा चाट, कचोरी चाट, दही बटाटा चाट, पाव भाजी इत्यादी पदार्थान्वर मस्त ताव मारला गेला...न शेवटी लस्सी आणि कॉफी इत्यादी पेयांनी पोटपूजेची सांगता केली गेली...
वेळ होता...जवळच नवे शोपर्स स्टॉप उघडले होते...त्याला भेट दिली...२५००-३५००च्या अगदी टुकार हाफ-पॅंट, हजाराच्या पटीतल्या किमतींचे सदरे आणि झगे आदी वस्तू पाहून भारतीयांकडे खूपच पैसा झालेला दिसतोय अशा तर्हेचे रिमार्क्स मनोमन मारत तिकडून बाहेर पडलो (तसे पुण्यातही मॉल आहेत न काही लोकांच्या आग्रहाखातर त्यांनाही भेटी दिलेल्या आहेत...तरीही माझे बापडे मन अजूनही अशा वस्तू पाहून अचंबित होते...) ...असो...मित्रमंडळीन्चा निरोप घेऊन निघालो...इतक्यात ह्या अथावाद्यात ठरवलेले एक मोठे काम राहिले आहे ह्याची आठवण झाली...काम होते: कॉर्नर हाऊसला जाऊन आइसक्रीम खाणे...ताबडतोब हे काम पूर्ण करून टाकायचे ठरले...कॉर्नर हाऊसला "Death By Chocolate" नामक सन्डे मिळते त्याची आर्डर दिली गेली....ब्राउनी, चोकोलेट फ़ज, चोकोलेट आइसक्रीम, चोकोलेट सॉस, त्यावर शेंगादाण्याचा चुरा न चेरीज...आहाहा...आता एवढे चोकोलेटसुद्धा माझ्यासारख्या चोकोलेट-लवरच्या डेथला कारण नाही होऊ शकले ही गोष्ट वेगळी...
अशा प्रकारे तर्हेतर्हेच्या पदार्थांचा आणि पत्त्यांचा आनंद घेऊन तृप्त झालेला आत्मा नवर्याच्या मागे गाडीवर बसून आरामात थंड वाऱ्याचा अडिशनल आनंद घेण्यात रममाण झाला....
एवढ्यात आठवण झाली ती "माहेरच्या मुराम्ब्याची"! :D माहेरची साडी, माहेरचे कुंकू वगरे ठीक आहे...पण माहेराचा मुरंबा! हा काय प्रकार आहे? तर त्याचे असे झाले की अभिजीत लग्नाआधी ह्या मित्रमंडळीन्सोबत रहात असताना ते सगळे रोज जेवण घरी तयार करायचे...तोंडी लावणे म्हणून मी रुखावतातला मुरंबा अभिजीतसोबत पाठवला होता...पण ह्यांनी तो काही संपवला नाही...म्हणून तो परत आणण्याचे काम करणे महत्त्वाचे होते...माझ्या माहेरच्या मुरम्ब्याला त्यांनी न खाल्ल्याने बुरशी लागून तो वाया गेला असता तर किती हाहाकार माजला असता ह्याची कल्पना अभिजीतला असल्याने मुरम्ब्याची आठवण करून देताच अभिजीतने गाडी मॅकच्या घराकडे वळवली....मॅकच्या घरी त्याचे आई-बाबा आले होते....काकूंनी मस्त पोहे केले...सोबतीला राजकोटचा म्हैसूर पाक आणि चिक्की होते...आत्मा अजून तृप्त झाला...
आता मात्र काहीही करण्याचे त्राण शिल्लक नव्हते...गाड़ी सरळ घराच्या दिशेने वळवली...घरी येऊन पांघरुणात दडी मारून मस्त झोपून गेलो...
आमच्या वीकेंडच्या आठवणी सांगता सांगता आज वीकडे आहे न आपल्याला काम आहे हे विसरूनच गेले...त्यामुळे रविवारची कहाणी बाकी असूनही सध्या राम राम घेते...उरलेली कहाणी ब्रेक के बाद!

Tuesday, March 23, 2010

आमचे पुणे!



IPL मध्ये पुढच्या वर्षी पुण्याची टीम भाग दिसणार अशी बातमी आली न काल्पनिक पुणेरी पाटयांसाठी लोकांना एक विषय मिळाला. असेच एक फॉरवर्ड मिळाले, जर्सीचे! कमाल वाटली नएखाद्या पोस्टद्वारे पुणेरी दुकानदार तसेच व्यावसायिक (चितळ्यांना दुकानदार म्हणून कसा चालेल बुवा) ह्यांना आदरांजली वाहण्याची इच्छा मनात आली.
गिर्हाईकांशी कसे वागू नये ह्याविषयीचे फुकटात ट्रेनिंग हवे असल्यास "चितळे बंधू मिठाईवाले" ह्यांच्याकडे जाच. फ़क्त काय निरीक्षण करायचे ते लवकर करून बाहेर पडाल ह्याची काळजी घ्या नाहीतर ट्रेनिंगच्या काही भागात तुमच्यावरच प्रयोग होण्याची शक्यता जास्त आहे. जर तुम्ही चितळ्यांच्या बाकरावड़ीचे fan असाल तर तुमच्याकडे शिस्त आणि पेशंस असणे आवश्यक आहे. चितळ्यांकडे बाकरवडीसाठी रांग असते. तुम्ही रांगेच्या १ इंच जरी बाहेर दिसलात तरी चितळ्यांचा शिपाई तुम्हाला हटकतो .. जर तुम्ही त्याच्याशी हुज्जत घालायचा प्रयत्न केलात तर चितळ्यांचा सेवक येऊन तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी शिस्तापालन कसे गरजेचे आहे ह्या विषयावर १ लेक्चर देतो. ह्या सगळ्या भानगडीत चितळ्यांचा त्या दिवशीचा बाकरवड्यांचा स्टॉक संपतो न रिकाम्या पिशवीने तुम्हाला घरी जायला लागू शकते...चिताल्यांनी एक शाळा काढली तर ही मानसे मुलांना शिस्त लावण्याच्या कामी उपयोगी पडतील...चिताल्यांची शाळा!
दुसरा नंबर येतो महेंदळे वाद्यवाल्यांचा! तंबोरा, पेटीसारखे जड़ वाद्य रिक्षातून उतारवल्यावर मेहेंदल्यांचा गडी तुमची मदत करायला येईल असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मूर्ख आहात. वाद्य घेऊन कसेबसे आत गेल्यावर तातडीने कोणीतरी येऊन त्याबद्दल चौकशी करेल असे तुम्हाला वाटले तर तो अजूनच मुर्खपणा असेल. तुम्ही आत जाल, बर्याच वेळ ताटकळत उभे रहाल, कधीतरी दुकानातल्या माणसांना तुमची दया येईल, माग ती येतील, तुमच्या वाद्याकडे चित्र-विचित्र कटाक्ष टाकतील...काय ही ब्याद आलीये अशा पद्धतीने वाद्याला उचलून जमिनीवर आपटतील.."काय झालय?" म्हणून चौकशी करतील न प्रॉब्लम कुठलाही असे ना एक आठवड्याने चौकशी करा असे ठराविक उत्तर देऊन तुमची बोळवण केली जाइल.
जोशी वडेवाल्यांकडे गेल्यावर तुम्ही फुकट वडे मागत आहात की काय अशी तुमची तुम्हालाच शंका येऊ शकते. काही दुकानांत बराच वेळ वाट पाहिल्यावर आपण इथे नक्की कशासाठी आलो होतो हे तुम्ही विसरून जायचीही शक्यता असते. याशिवाय जनसेवा दुग्धालय, जुने डेअरीवाले, बेकरीवाले, रिक्शावाले, कंडक्टर, टेलर, सोनार हे तुम्ही पुण्यातच आहात हे विसरु नये ह्याची वे ळोवेळी दक्षता घेताच असतात!
गेल्या आठवड्यात दादा-वाहिनीसोबत नवरत्न भेळ इथे भेळ खायला गेले. नेहमीच्या सवयीप्रमाणे १ मीडियम, २ गोड अशी आर्डर दिली प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी (action-reaction) तसा दुकानदार खेकसला "आमच्याकडे एकाच प्रकारची भेळ मिलते. आत तिखट-गोड पाणी ठेवलेले आहे. हवी अशी करून ह्या..". "बापरे, केवढा हा अपराध असे वाटून आम्ही आत जाऊन बसलो." (तिथली भेळ खरच चांगली असते म्हणून नाहीतर पुणेरी स्वभावानुसार दुकानादाराच्या तोंडावर शिव्या घालत तिकडून निघालो असतो..असो). तर १ च प्रकारची भेळ जिच्यात लोकांनी स्वतः पाणी घालून चवीनुसार तिखट बनवावी अशी पद्धत असेल तर दिलेली भेळ कमी तिखट नको का? भेळ खायला लागल्यापासून २ मिनिटात दादा- वहिनीचा चेहरा तिखटामुळे लाल झाला! ह्याच दुकानात अजुन एक मजेदार पाटी दिसली! "नवरंग भेळ होटल च्या गिर्हाईकांनी वाहने अमुक-अमुक ठिकाणी लावावीत!" होटल नवरंग बर का..जागा ८*८ पण नसेल. बाकड़ी गुर्हाळात असतात असली लाकडी...संपला विषय!
मजेचा भाग बाजुला ठेऊ..ही सगळी परिस्थिती पाहता मराठी माणसाच्या हातून सगळे व्यवसाय जात चाललेत, जिथे पाहू तिथे बिहारी, मारवाड़ी, गुजराती, भैये लोक दिसतात अश्या बोम्बा मारण्यात काही तथ्य आहे का? उद्या चितले, मेहेंदले, नवरत्न भेळवाले ह्यांच्या क्वालिटीचे प्रोडक्टस बनवून एखादा मारवाड़ी विकू लागला न स्वभावधर्मानुसार गिर्हाइकानशी गोडीने वागू लागला तर आपण तरी त्यांच्याकडे जाऊ का?
पुण्याच्या मराठी माणसांनी खरेच "जागे" व्हायची गरज आहे. पुण्याची मुंबई व्हायला फारसा वेळ उरलेला नाही...

Friday, March 12, 2010

आनंदोत्सव!

सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण IIT तल्या लोकांसाठी सर्वांत आनंदाचा काल म्हणजे लाईट गेलेले असतात तेव्हाचा काळ! "हा काय प्रकार आहे! ", असे वाटले असेल न एकदम!
IIT त सण वगरे साजरे होत नसतात. मेस वाल्यांनाच दया आली तर ते गोडाधोडाचे करतील तेवढाच काय तो बदल. बाकी सुट्टीचा पूर्ण "आनंद " घेता यावा यासाठी प्रत्येक प्रोफेसर असाइनमेंट देतो. फराळासारखे प्रोब्लेम्स असतात सोडवायला. दिवाळीत एखादी पणती मिणमिणताना दिसते. ती इतकी बिचारी असते कि कधी जीव सोडेल ते सांगता येत नाही. आकाशकंदील नामक प्रकार कॅम्पसच्या बाहेर पडल्याखेरीज दिसत नाही. असो! तर मुद्दा हा कि "सण = आनंद" ह्याची truth value शून्य आहे. बाकी कोणत्याही गोष्टीतून आनंद मिळत असेल तरी अर्ध्या तासापलीकडे (फारतर एक तास...interesting movie असेल तर १.३० तास!) लोक तिच्यात मन लावत नाहीत. IIT चे विद्यार्थी you know!
तर मग लाईट जायचा न आनंद व्हायचा काय संबंध? तर संबंध असा, की आम्ही IIT त यायच्या आधी इकडे लाईट फारसे जात नसत. साहजिकच generators इथे अजिबात आढळत नाहीत. एवढेच काय इथल्या अनेक servers नादेखील backup नसतो. लोकांच्या खोल्यांमध्ये मेणबत्त्या नसतात. त्यामुळे लाईट गेले की कोणालाच काहीच काम करता येत नाही. फार तर ज्यांच्याकडे laptops आहेत ते लोक काही काळ काम करायचा प्रयत्न करून पाहतात! बर मग? ह्यात तर सगळे आहे. IIT तले लोक एकमेकांवर फार लक्ष ठेउन असतात. लोक अभ्यास करत नाहीयेत म्हणाल्यावर कमालीचा आनंद होतो त्यांना (ह्याला अपवाद असतात, न अशा लोकांची सादर माफी मागत आहे). तेव्हा लाईट गेलेत म्हणजे कोणीच काम करू शकत नाहीये, तेव्हा आपण पण टाईमपास करायला मोकळे ह्या कल्पनेने सगळ्यांना एकदम उत्साह येतो. खोलीत अंधार असतो न शिवाय मुंबईची हवा, प्रचंड उकडत असते. धक्का लावल्यावर पोळ्यातून मधमाश्या जश्या भराभर बाहेर पडायला लागतात तशी IIT तली मुले (न मुलीही) रस्त्यावर येतात. लेकसाईडला एकदम COEP च्या बोटक्लबचे रूप प्राप्त होते. फुटपाथ हे चालण्याखेरीज फतकल मारून बसायलाही वापरले जाऊ शकतात ह्याची प्रचीती येते. काही जण घोळक्याने laptop वर सामुदायिक चित्रपट-दर्शनाचा कार्यक्रम सुरु करतात. समस्त महिलावर्ग H11 मधून बाहेर एकदम पडल्याने काही लोकांना तर फारच जास्त आनंद होतो. एकावेळी इतक्या मुली IIT मध्ये! भारीच!! H11 समोर गर्दी जमू लागते. (सर्व मुलींची ह्या वाक्याबद्दल माफी. ही fact आहे. )
काही लोक IIT च्या बाहेर पडतात, हॉटेल्सची चंगळ होते. काही लोक जमून डंब-सी, अंताक्षरी सारखे खेळ खेळायला लागतात. काही लोक गझला गावून मनात साचलेल्या भावनांना वाट करून देतात. तर काही लोक गिटारवर गाणी म्हणतात.
काही लोकांना अचानक व्यायामाची महती आठवते न चक्क track pant n sport shoes अशा कडक तयारीत बाहेर पडून मैदानावर पळायला जातात.
तर असा हा आनंदोत्सव पाहून IIT लाही आपल्यामध्ये माणसेच राहतात ह्याची खात्री पटत असेल. लाईट परत कधी येऊच नयेत असे तिलाही वाटत नसेल तरच नवल!
काही लोकांची मात्र भयंकर पंचाईत होते. paper submission, presentations च्या deadlines असतील तर एकेक क्षण एकेका तासासारखा वाटतो. माझ्यावर अशी वेळ फारशी आलेलीच नाही. उलट एकदा माझी परीक्षा होती न लाईट गेले. खूप वेळ वाट पाहूनही आलेच नाहीत. म्हणून मग शेवटी सरांनी सोडून दिले. मग आम्ही खूप मज्जा केली. शेवटी ती परीक्षा रात्री ९-१२ ठेवण्यात आली. फारच मजेदार experience होता तो. दिवस इतका छान गेला होता की परीक्षा कशी झाली ह्याचा डोक्याला विचार न करू देताच सगळ्यांनी आपापले पाय कॅन्टीनकडे वळवले. गरमागरम कॉफी न शांत झोप!
IIT बद्दल मी उपरोधक काहीतरी लिहित असले तरी असे छान छान अनुभव फक्त IIT च देऊ शकते. technology साठी नाही तरी त्यांसाठी तरी प्रत्येकाने एकदा तरी IIT तल्या life चा अनुभव घ्यावाच!
आजच मजा झाली. lab मधून निघाले न वाटेत असताना अचानक लाईट गेले.बाप रे! सगळीकडे अंधार...रस्त्याला आत्ताच पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या लावल्या आहेत त्या तेवढ्या चमकत होत्या. काहीही दिसत नव्हते. अशा वेळी बिबट्या-साप यांसारख्या कॅम्पसमध्ये राहणाऱ्या प्राण्यांची विशेष आठवण येते..काही अंतर चालल्यावर गाड्यांचा प्रकाश दिसू लागल्यावर कुठे जीवात जीव आला. पटकन होस्टेलवर आले. पण रूमवर जायची सोय कुठे होती! माझा फोन फारच अत्याधुनिक :D असल्याने फारच प्रकाश देतो. त्यामुळे जिना तर अगदीच clear दिसतो. त्यात खोलीत मेणबत्ती नसतेच. passeges भूतबंगल्याची आठवण करून देतील असे न लोक आपापल्या labs मध्ये! बर काही काळ खाली बसावे म्हणाले तर आमच्याइथले डास साधे-सुधे चावत नाहीत तर आपल्याला अजून काही काळ बसले तर त्यांनी रक्त शोषल्याने आपल्याला anemia होईल की काय अशी माणसाला भीती वाटू शकण्यापर्यंत मजल गाठतात. IIT च्या BTECHs न जशी स्पेशल माजुर्डेपणा दिलेला असतो तसे इथल्या दासांनाही परमेश्वराने स्पेशल लांबीची सोंड दिली आहे की काय असा प्रश्न पडतो! jeans मधूनसुद्धा माणसाच्या पायापर्यंत पोचण्याची ability ह्या सोंडान्मध्ये असते. असो! किशोर कुमारच्या "जाते थे जपान पोहोंच गये चीन समझ गये ना" ह्या गाण्यासारखी माझी गाडी "IIT तल्या आनंदोत्सवाकडून" डासबोधाकडे पोहोचण्याआधीच थांबवावी हे बरे!

Friday, February 26, 2010

नवरस (IIT तले)!

श्रृङ्गारवीरकरुणाद्भुतहास्यभयानका:|
बीभत्सरौद्रौ शान्तश्र्च काव्ये नवरसा: मता:||
घाबरू नका! मी संस्कृत, सुभाषिते वगरे यांविषयी मुळीच लिहिणार नाहीये...पोस्ट वाचून मजा नावाची गोष्ट उत्पन्न होणे हाच ह्या पोस्टचा प्रामाणिक हेतू!
तर वर लिहिलेला श्लोक मी सगळ्यात आधी शिकले ते डान्सच्या क्लासला..ह्यात भरतमुनी "शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत" अशा नऊ रसांचा उल्लेख करतात. हा श्लोक अचानक अथावान्याचे कारण की परवा इथे एका कार्यक्रमात "नवरस" नावाचा नृत्यप्रकार सादर केला गेला. त्यात वेगवेगळ्या प्रसंगांची उदाहरणे घेऊन नऊ रसांचा अभिनय केला जातो. (बाप रे! मी डान्सच्या परिक्षेतला पेपर लिहितीये असे वाटत आहे.) त्यावेळी माझ्या डोक्यात कल्पना आली की "ही उदाहरणे सामान्यपणे ऐतिहासिक घटनांमधून घेतलेली असतात. म्हणजे शृंगारासाठी राधा-कृष्ण, रौद्र रसासाठी रावण इत्यादी. जर का लोकांना डान्स आपलासा वाटावा अशी इच्छा असेल तर त्यांना त्यांच्या रोजच्या आयुष्यातले प्रसंग दाखवले तर? हमम...IIT च्या विद्यार्थ्याच्या जीवनावर आधारित नवरस!" मज्जा...
शृंगार....शृंगार रस वगरे सोडा, इथे matching कानाताले, एखादे ब्रेसलेट, छानशी पर्स अशा सौंदर्यात भर घालणार्या (?) वस्तूंचा वापर करण्यावर बंदी आहे. जर का कोणी छान कपडे घातले तर "आज तुझा वाढदिवस आहे का?" असे विचारले जाते.नाही म्हणायला IDC आणि SOM मधल्या आहेत...तोच काय तो IIT च्या मुलांच्या मनांना (डोळ्यांना?) आधार! बाकी MOODI चा काळ म्हणजे IIT तली बहार..मुलांच्या मनातले मोर थुई-थुई नाचून तृप्त होतात...बाकी सगळा दुष्काळ!
वीर रस...एखाद्या मुलाचा वाढदिवस असेल की बाकीच्या मुलांचे मन वीर रसाने ओपप्रोत भरून जाते...लाथा, बुक्क्या, टपल्या इत्यादींचा प्रयोग मनसोक्त केला जातो.
करुण रसाचा आविष्कार तर इथे सारखाच होत असतो...प्रत्येक मास्तर दर आठवड्याला surprize test घेत रहातो न प्रत्येक टेस्टगणिक विद्यार्थ्याच्या मनातील आशेचा एकेक किरण भोपळ्याआडून वाकुल्या दाखवतो...त्या भोपळ्याकडे पाहाणार्या मुलाचा चेहरा कारुण्याने भरलेला असतो...
अद्भूत...काही काही शिक्षकांच्या लेक्चरमधले एक वाक्य जरी समजले तरी जीवनात काहीतरी अद्भुतरम्य घडले असे वाटते. शिवाय आपण पेपरमध्ये लावलेले दिवे अगदीच टाकाऊ नाहीत ( थोड़े मार्कस पाडण्यास उपयोगी आहेत) हे जेव्हा दिसते तेव्हा प्रचंड आश्चर्य वाटते...तसेच मेसचे जेवण किंवा त्यातला एखादा पदार्थ जरी आवडला तरी फार अद्भुत घडल्याचा फील येतो..
हास्य...हास्याचा इथे तुटवडाच...पण तरी Friends, rom-com सारख्या गोष्टी प्रत्येकाला "हसायला मदत" करतात...
भयानक...साप दिसणे, बिबट्या दिसणे, आपल्या खोलीतल्या पलंगावर माकड बसलेले असणे अशा घटना वारंवार भयानक रसाची अनुभूती घडवतात...शिवाय SFML, Graph Theory, Linear Optimization वगरे सारखे विषय (किमान माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या) लोकांच्या मनाला हादरे देण्याचे काम करत असतात ते वेगळेच..
बीभत्स रस...theoretic विषयांमधल्या
α, β, γ

आदि ग्रीक अक्षरांनी भरलेल्या expressions काही लोकांना भेदी वाटल्या तरी माझ्या मनात बीभत्स रस निर्माण करतात,
अतिशय त्याज्ज्य, तुच्छ अशा वाटतात मला त्या...सांगत असतात काहीतरी फालतूच, पण दिसायला किती वाईट असतात...
रौद्र रस...guides ह्या रसाचा घडोघडी साक्षात्कार करून देतात। कारणे अनेक: मुलांनी अनेक दिवस तोंड ना दाखवणे, अपेक्षेप्रमाणे रिझल्ट्स न येणे, काम न करणे (हे काही वेळी खरे असते न काही वेळी उगाचच असते)...शिवाय उगाच रौद्र रूप धारण करण्यात काही guides चा हातखंडा असतो...लेक्चरमध्ये मुलांनी उशिरा येणे, गप्पा मारणे, झोपणे, अभ्यास न करणे इत्यादी पारंपारिक कारणेसुद्धा रौद्र रसाचे दर्शन घडवून देण्यात महत्त्वाचा role निभावतात. विद्यार्थ्यांनाही ह्या रसाचा वापर करता येतो बरे का...TA ने किंवा प्रोफेसराने पाव मार्कसुद्धा कमी दिला की अचानक रुद्रावतार धारण करून काही मुले त्यांच्यावर चाल करून जातात....
शांत...ह्या रसाचा अनुभव घ्यायचा असेल तर H-1 ला जावे... Ph.D. सुरू झाल्याला अनेक वर्षे (७-९) लोटलेले पण ते संपण्याची वाट पहाण्याच्या पलिकडे पोचलेले हे IIT तले महर्षी...राग, लोभ, मत्सर सर्व प्रकारच्या (मानवी) भावनांना आवर घालण्याची सिद्धी त्यांना प्राप्त झालेली असते. अर्थात त्यांच्या guides चा ह्यात फार मोठा वाटा असतो. ह्यांच्या चेहर्यावर शांत भाव कायमचेच वास्तव्य करून असतात...
म्हणजे IIT च्या जीवनावर आधारित शृंगार, हास्यासारखे जीवन रसपूर्ण करणारे रस सोडले तर इतर रसांवर एखादे नृत्य सादर करणे शक्य आहे तर!

Monday, February 15, 2010

(Again) A Saturday!

I would be very happy to write about a sequel of my previous post 'A Saturday', the Saturday which was full of fun, food, exploration..But...
It was a Saturday and I had gone for a classical music program with my family. The program was nice. But, frankly speaking the Wada at Yashawantrao Chavan Natyagruha is what I could appreciate the most. The program ended at 8.30. On our way to my home we could observe a bunch of police standing on the corner of a road. But, such a site is not rare in Pune. So, we ignored it. Eventually we reached our home.
TV was on and the program being broadcated was a kind of reality show (not a stupid one! They call people who have suffered through a challenging situation in their lives to discuss how they fought with it.) They had called a widow they day. She said that:
She was a commerce graduate when her parents decided to arrange her marriage. They came across a boy who was an engineer. The girls' parent had some acquintance with the boy's parents. So, within a couple of days after the marriage proposal was put forward by the boy, the girls' parents accepted it.
The girl got married with the boy. Everything was going on very well till the girl heard some discussion about some operation. On questioning about the operation to her husband the girl came to know that it was his operation that was being planned and it was a HEART surgery. Till that day, nobody ever talked her about this problem. The brother of the girl came across the health reports about the boy in the hospital. On requesting the information from the doctor he understood that there were only 50% chances of survival (he did not tell this to the girl)! This incidence happened just 4-5 months after their marriage. The girl kept on convincing herself that everything will be alright. The operation got done. One day, the bloodpressure of her husband went down and before he was reached to hospital he died.
During the 13-day long cremation ceremony nobody talked to her. Her Red bindi (a symbol of her married status) was replaced with a black one (indicating that she is a widow). Her bangles were broken by striking her arm against the dead body of her husband. She was asked to wear blue bangles (again a symbol of widowness). The girl said that she remembers this incidence after so many years...After all, she is an educated woman of independant India (?)...On the forteenth day she was taken back to her family by her brother. On the way her home her Bhabhi removed her blue bangles, and the black bindi was replaced by the red one and said "Just forget about these 6 months. This is the beginning of your new life." (This was very appreciable move!)
She said that a number of proposals for marriages started coming but all from widowers (who had children). People kept on taunting her about her loss of verginity and blamed her for her husdand's death (the boy had the heart-injury since a long time before the marriage). She was so hurt that she decided not to marry.
She said that she feels very angree because of the way she was cheated. Why did the boy marry her if he was aware of his illness? Could not he think about the girl's life? How terrible it is! A single decision completely ruined her life.
Suddenly my phone rang, it was Abhijeet who had called me to see if I was alright. "What happened?" I said. "A bomb blast has ripped through Pune!", Abhijjet. Ohhh I did not know this! I switched on the TV. I could see the "breaking news" regarding the bomb blasts in my city which I was unware of.
The surprising thing was that I was not very surprised to hear that...Instead of getting scared my brain started looking for the details: "Where did it happen? Oh ok, German Bakery, near Chabad house, Osho ashram..Hmm..The purpose clear...targetting foreginers or high-class people..How did it happen" etc etc.
Isn't that strange? We are "used to" these blasts which are "ROCKING" India again and again! We are helpless! Koi bhi ata ha, blast karawata hai...hum kuch nahi karate...Nobody is sure that s/he will return his/her home safely...
Sigh...High alert was declared! I postponed my plan of leaving for Mumbai the next day...Everybody is watching the news reports and reading the news paper for more details...Thats it! What next?
Weren't these two news sufficient to steal my sleep?

Sunday, January 10, 2010

A Saturday!

The last few days were very hectic...I had decided that I was going to take enough rest and enjoy a lot on the coming Saturday! And here it was, it was a Saturday morning!
On the Friday night, I had warned my brain not to alarm early in the morning as it does always when I am here at IIT (fortunately, it does not do so when I am home :))...But, it obeyed my order and alarmed half an hour late :( I tried to be lazy, tried not to come out of my bed for some time, but I found it too boring to do so :D Finally I got up, had "something" in "mess"...
Now what? I wanted to have some nice time n I felt like watching a pleasant movie! It was a just 8.30 a.m. and I was about to watch a movie :D The search began. I usually avoid watching the movies involving emotional atyaachaar (horror, voilent (physical or psychological), suspense) at IIT, so the obvious option was to watch a Rom Com or simply romantic movie. DC++ is one of my good friends at IIT, quit predictable and helpful...It presented me with a big list of romantic movies, which I started scanning through. My eyes halted at "Something New"! I went through the movie review on IMDB, and found the movie "watchable"...So, there was "something new" about to happen today?
Actually there was "nothing new" in the theme but it was a pleasant one! It had a "feel good" factor in it. Nice acting, music, direction etc a usual! It changed my mood and put some enthu in me! I made some plans for the day...An ice-cream scoop or a two were the must! As I am an IITan, atleast a bit of a work (though it may not be productive :p) had to have its place in the plan..So I decided to go to lab, work for sometime and then go ahead with the other plans...
Following the same road, the same starecases, the same passages I reached the lab...My senses expected the same gloomy atmosphere but...I could here the pleasant, melodic instrumental tune of "Dil hai chhotasa"...Manoj was in a different mood today and he continued "play"ing melodic, romantic songs one after the other...I started my journey through the world of the music, the roads of the tunes, the breezes of the melodies..."You are hungry" my stomach screamed! It felt like suddenly falling into a valley...Tumbling off the valley, I settled on my table in the lab :( I looked at the clock...Ohh, it was 1.15 and if I did not move to "the mess" immediately, a parade through the hell was destined! :(
So, I had to get up and push myself towards "the mess". On entering the hostel, I started observing the faces of the girls "coming out of the mess"! They did not seem to be miserable! It boosted my spirit. I had my lunch which was surprisingly edible!
"Hmm...Done with the lunch, now I should work for some more time (did I really work before lunch?) and then continue with my enjoyment plans...", I started thinking and suddenly Harshada's waving hand came rushing towards me, followed by the voice, "Hey, you were planning to go home right?" "No, I had to change my plans", I said. "Meet my friend Prajakta. We are planning to go on an outing. Coming?" It did not take even a moment for me to say "Yessss", I did not even bother to ask about the detailed plan....We finished our dinner and left for our "Mumbai Darshan" tour! Next 7-8 hours were full of fun! They made my day!!
It will take some more time to write about the trip but I need to work now, so will come back with one more post soon....

Monday, December 21, 2009

बिबट्या आला रे आला...

खूप दिवस झाले काही लिहिलेले नाही...हात लिहायला शिवशिवतायत, न मन साठलेले रिते करायला...
मी इतके दिवस का नाही लिहिले काहीच...? लिहिण्यासारखे काहीच पाहिले, वाचले वा अनुभवले नाही...मम तसे तर शक्यच नाही...प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो... मग मला काही लिहावेसे वाटले नाही...अहं खूपदा इच्छा झाली...मला वेळ नव्हता...हमम ही excuse चांगली आहे...
माझ्या प्रोजेक्टची स्टेज, प्लेसमेंट्स होत्या ना...आपण काही काही गोष्टींचा किती बाऊ करतो नाही का...विनाकारण...प्रोजेक्टची स्टेज होणारच होती, न प्लेसमेंटसुद्धा ...असो!
तर म्हणून मी काही लिहिले नव्हते...पण मधल्या काळात काही काही मजेदार गोष्टी घडल्या share करायलाच पाहिजेत अश्या...
दरवर्षीनुसार बिबट्या आपली "IIT Safari" करून गेला...आपण कसे जातो अभयारण्यात प्राणी पहायला, change म्हणून, तसे बिबट्यालाही बहुतेक अभयारण्यातील तेच तेच प्राणी पाहून कंटाळा येतो न तो वेगळे प्राणी दिसावेत म्हणून IIT त येतो...केस, दाढ़ी-मिश्या वाढवलेले, हाफ चड्डी घातलेले, अंघोळ न केलेले, कधीही न धुतलेले कपडे घातलेले इकडचे विद्यार्थी त्याला जंगलामधील प्राण्यांइतकेच ओळखीचे वाटले तर त्यात काही आश्चर्य नाही..सोबत साप, माकडे, सरडे, घोरपडी आदि प्राणीही दिसले की त्याला अजूनच comfortable वाटत असेल...
हा तर नेहमीप्रमाणे बिबट्या IIT त येऊन गेल्या...लेक- साइड, हिल-साइड वगैरे ठिकाणी कोणाला तो दिसला, न त्यावर त्यांची reaction काय झाली ह्याच्या चर्चा मेसच्या टेबलावर झडायला लागल्या...काही दिवसांनी नेहमीप्रमाने सिक्यूरिटीवाल्यांचे मेल आले "बिबट्या बद्दलची सूचना: गेले काही दिवस campus मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्या दिसल्याच्या बातम्या येत आहेत. बिबट्याला पकड़ण्याचे/रानात परत पाठवण्याचे प्रयत्न वन खात्याकडून केले जात आहेत. vulnerable ठिकाणी विशेष गस्ती पथके गस्त घालत आहेत. तरी लोकांनी खालील सूचनांचे पालन करावे." ह्या सूचना वाचताना काय काय इचार मनात आले ते मजेदार होते...
१) प्राण्याला दगड मारून त्याला छेडू करू नये (बिबट्याला दगड मारायची हिम्मत कोणी करत असेल असे वाटते का?)
२) प्राण्याचे फोटो घेऊ नयेत, त्याचा पाठलाग करू नये, तो चेकाळेल अशी कोणतीही genstures करू नयेत. (imagine, की बिबट्या समोर आहे, न तुम्ही असे उद्योग करत आहात! :D )
३) बछड़े दिसले तर ते चेकाळतील अशा प्रकारे वागू नये कारण त्यांच्यासोबत असणारा प्राणी धोकादायक ठरू शकतो. (असा काही करायची कोणाची हिम्मत होइल का?)
४) आजूबाजूचे कुत्रे भुन्कू लागणे, सैरावैरा धावू लागणे हा धोक्याचा इशारा समजावा. (इयत्ता चौथीतल्या मुलालाही आजकाल हे द्न्यान असते असे नाही वाटत का?)
५) बिबट्याला प्रकाश न फटाक्यांची भीती वाटते, तेव्हा रात्री बाहेर पडल्यास सोबत टोर्च असू द्यावा व तो flick करत ठेवावा! (हे असे किती दिवस करायचे? ज्या दिवशी टोर्च विसरू त्याच दिवशी बिबट्या आलातर? )
शिवाय अजून एक conversation फारच मजेशीर होते...
हे मेल ज्या सिक्यूरिटी सेक्शनकडून आले आहे त्यातच कामाला असणारे शिपाईकाका एकदम घामाघूम होऊन रात्रीच्या ड्यूटीवर आले न आधीच्या शिफ्टवर असणार्या शिपाई काकांना म्हणाले, "आज लय danger गोष्ट झाली रे येता येता...मी असा भराभरा निघलेलो...वाघ फिरतोय ना...हा तर निघलेलो...तर शेजारून एकदम छोटं जनावर जात असल्यागत वाटलं ...माझी असली टरकली...म्हनला बिबट्याचं पिल्लू असन...म्हंजे त्याच्या मागं त्याची आई बी असणार...धावायचं म्हनलं तर जमतय कुठलं आता...म्हनलं रामाचं नाव घेऊ न काय...निगलो तसाच ते गुमान हिकडं आल्यावर श्वास घ्येतला... "
आता असे हे आमचे सिक्यूरिटी गार्डस...बिबट्यालाही मजा वाटत असेल ना...अभयारण्यात तर त्याला कोणी घाबरत नाही...तेवढाच जरा change :D

note: मेलचे जे भाषांतर आहे ते अतिशय बण्डल दर्जाचे आहे तरी वेळेअभावी त्याला दुरुस्त करणे शक्य नाही तेव्हा भावना समजाव्यात, अगदीच चिडचिड खाली तर उघडपणे (comments चा वापर करून) अथवा मनातल्या मनात बिनधास्त शिव्या घालाव्यात...