Monday, December 21, 2009

बिबट्या आला रे आला...

खूप दिवस झाले काही लिहिलेले नाही...हात लिहायला शिवशिवतायत, न मन साठलेले रिते करायला...
मी इतके दिवस का नाही लिहिले काहीच...? लिहिण्यासारखे काहीच पाहिले, वाचले वा अनुभवले नाही...मम तसे तर शक्यच नाही...प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो... मग मला काही लिहावेसे वाटले नाही...अहं खूपदा इच्छा झाली...मला वेळ नव्हता...हमम ही excuse चांगली आहे...
माझ्या प्रोजेक्टची स्टेज, प्लेसमेंट्स होत्या ना...आपण काही काही गोष्टींचा किती बाऊ करतो नाही का...विनाकारण...प्रोजेक्टची स्टेज होणारच होती, न प्लेसमेंटसुद्धा ...असो!
तर म्हणून मी काही लिहिले नव्हते...पण मधल्या काळात काही काही मजेदार गोष्टी घडल्या share करायलाच पाहिजेत अश्या...
दरवर्षीनुसार बिबट्या आपली "IIT Safari" करून गेला...आपण कसे जातो अभयारण्यात प्राणी पहायला, change म्हणून, तसे बिबट्यालाही बहुतेक अभयारण्यातील तेच तेच प्राणी पाहून कंटाळा येतो न तो वेगळे प्राणी दिसावेत म्हणून IIT त येतो...केस, दाढ़ी-मिश्या वाढवलेले, हाफ चड्डी घातलेले, अंघोळ न केलेले, कधीही न धुतलेले कपडे घातलेले इकडचे विद्यार्थी त्याला जंगलामधील प्राण्यांइतकेच ओळखीचे वाटले तर त्यात काही आश्चर्य नाही..सोबत साप, माकडे, सरडे, घोरपडी आदि प्राणीही दिसले की त्याला अजूनच comfortable वाटत असेल...
हा तर नेहमीप्रमाणे बिबट्या IIT त येऊन गेल्या...लेक- साइड, हिल-साइड वगैरे ठिकाणी कोणाला तो दिसला, न त्यावर त्यांची reaction काय झाली ह्याच्या चर्चा मेसच्या टेबलावर झडायला लागल्या...काही दिवसांनी नेहमीप्रमाने सिक्यूरिटीवाल्यांचे मेल आले "बिबट्या बद्दलची सूचना: गेले काही दिवस campus मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्या दिसल्याच्या बातम्या येत आहेत. बिबट्याला पकड़ण्याचे/रानात परत पाठवण्याचे प्रयत्न वन खात्याकडून केले जात आहेत. vulnerable ठिकाणी विशेष गस्ती पथके गस्त घालत आहेत. तरी लोकांनी खालील सूचनांचे पालन करावे." ह्या सूचना वाचताना काय काय इचार मनात आले ते मजेदार होते...
१) प्राण्याला दगड मारून त्याला छेडू करू नये (बिबट्याला दगड मारायची हिम्मत कोणी करत असेल असे वाटते का?)
२) प्राण्याचे फोटो घेऊ नयेत, त्याचा पाठलाग करू नये, तो चेकाळेल अशी कोणतीही genstures करू नयेत. (imagine, की बिबट्या समोर आहे, न तुम्ही असे उद्योग करत आहात! :D )
३) बछड़े दिसले तर ते चेकाळतील अशा प्रकारे वागू नये कारण त्यांच्यासोबत असणारा प्राणी धोकादायक ठरू शकतो. (असा काही करायची कोणाची हिम्मत होइल का?)
४) आजूबाजूचे कुत्रे भुन्कू लागणे, सैरावैरा धावू लागणे हा धोक्याचा इशारा समजावा. (इयत्ता चौथीतल्या मुलालाही आजकाल हे द्न्यान असते असे नाही वाटत का?)
५) बिबट्याला प्रकाश न फटाक्यांची भीती वाटते, तेव्हा रात्री बाहेर पडल्यास सोबत टोर्च असू द्यावा व तो flick करत ठेवावा! (हे असे किती दिवस करायचे? ज्या दिवशी टोर्च विसरू त्याच दिवशी बिबट्या आलातर? )
शिवाय अजून एक conversation फारच मजेशीर होते...
हे मेल ज्या सिक्यूरिटी सेक्शनकडून आले आहे त्यातच कामाला असणारे शिपाईकाका एकदम घामाघूम होऊन रात्रीच्या ड्यूटीवर आले न आधीच्या शिफ्टवर असणार्या शिपाई काकांना म्हणाले, "आज लय danger गोष्ट झाली रे येता येता...मी असा भराभरा निघलेलो...वाघ फिरतोय ना...हा तर निघलेलो...तर शेजारून एकदम छोटं जनावर जात असल्यागत वाटलं ...माझी असली टरकली...म्हनला बिबट्याचं पिल्लू असन...म्हंजे त्याच्या मागं त्याची आई बी असणार...धावायचं म्हनलं तर जमतय कुठलं आता...म्हनलं रामाचं नाव घेऊ न काय...निगलो तसाच ते गुमान हिकडं आल्यावर श्वास घ्येतला... "
आता असे हे आमचे सिक्यूरिटी गार्डस...बिबट्यालाही मजा वाटत असेल ना...अभयारण्यात तर त्याला कोणी घाबरत नाही...तेवढाच जरा change :D

note: मेलचे जे भाषांतर आहे ते अतिशय बण्डल दर्जाचे आहे तरी वेळेअभावी त्याला दुरुस्त करणे शक्य नाही तेव्हा भावना समजाव्यात, अगदीच चिडचिड खाली तर उघडपणे (comments चा वापर करून) अथवा मनातल्या मनात बिनधास्त शिव्या घालाव्यात...

Thursday, September 17, 2009

Jago!

The song "Luka Chupi" from "Rang De Basanti" always is very touching and always makes me cry.
In the morning, I was getting bored and felt like I should listen to music. What kind of music? Rahman ka gana...I opened DC++ and searched for Rehman and the first song that appeared in the list was Luka Chupi. I love the song. I downloaded it immediately and started playing it.
लुका छुपी बहुत हुई सामने आजा ना, कहाँ कहाँ ढूँढा तुझे थक गयी है अब तेरी माँ,
आजा सांझ हुई मुझे तेरी फिकर, धुन्दला गयी देख मेरी नझर आ जाना |
Tears started rolling down...I could not stop them. Why was I so upset...The words made me picturize my aunt who lost her 11 year old son in a bus accident! Many of you must have read the news about Panvel School Bus suddenly catching fire, causing the death of 5-6 students...One of them was my brothe, Aniket!
We keep on reading such news everyday, we surely feel sad, but this time it was different in my case! He was my brother after all!!
How did that happen? Aniket's school is just 5 minutes away from his home. My aunt helped him get into the bus and started walking towards the home. Few moments later she observed flames and fumes but thought that they were the ones due to the crimation going on in the nearby crimatorium... Sometime later she received a phone call saying that the school bus had caught fire and her son is admitted in the nearby hospital and that he was 50% burnt!!!
What was the cause of fire? It was just the carelessness of the driver. The bus carried a can of petrol. Students were telling the driver that "petrol ki badboo aa rahi hai! Please gadi rok do!!" If he would listened to them and stopped the bus, the accident would have been avoided! But he did not!! He was busy talking on the cell phone!!
Few minutes later, suddenly there was a blast and the bus caught fire. The temperature started rising. The students sitting in the front managed to jump out of the bus. The senior students sitting at the back of the bus managed to jump from the windows with the help of people. But, Aniket was standing in the middle part of the bus. As the petrol tank (which lies exactly below where my brother was standing) caught fire, his hands and legs got burnt before he could even move. What do you think the driver-cleaner did? Hearing the bang of the blast, they started running away from the bus as they were affraid!!!
Eventually every student managed to get out of the bus. The driver-cleaner fortunately used their brains and came back to help them. They stopped a 6-seater, helped 5-6 students to get into it and asked the driver to drop them to xyz hospital. A car passing by was stopped and two students were asked to be dropped at some other hospital. These students were siblings. The car-driver was affraid of the fact that Police would consider him responsible for the accident and would torture him. So, he dropped them outside the hospital and left. 10-12 year old, 60% burnt students walked inside the hospital, called their parents!! Both of them died later!!!
Coming back to Aniket, he was later to a hospital dedicated for Burn treatments. My aunt said that his school-bag was half-burnt. The hands-legs were burnt so that the skin had vinished. The other parts of the body were not actually burnt, but were damaged due to the steam (containing chemicals). The Steam had even caused his clothes to become stiff. They had to be cut using a scissor. He was kept in an ICU, alone....nobody around! His parents were allowed to meet him only for 5-10 minutes in the whole day due to the fear of infection (as his limbs did not carry skin as a protection). A number of capilary tubes connected throughout the body! Shouldn't there be some consideration of child-psychology? He was shaking with pain. His mother could not do anything but observe him in that situation. Can't something be done to avoid this? If she was allowed to sit besides him, he would have felt much better. The nurses were allowed to go inside. If parents are asked to take the same hygienic measures as the nurses do, they may be allowed to go and seat besides the child. An 11-year old needs some mental support to bear the pain, to gather some hopes for living. The infection in the hands-legs started spreading in other organs of the body. To suppress them, strong doses were given, which resulted into failure of critical organs like kidney! The toxins which had entered his body through the fumes had no way to get out of it and eventually the case went out of the control!!
Why am I telling you all this? Isn't media efficient enough to cover this?
I am telling this to you in perspective of human being (and not a reporter, interested in covering the news) I feel that we should learn a few lessons out of all this."
What kind of pain the parents, who lost their both children, must be undergoing? Can we even think about it?
A moment of ignorance caused so many lives to end, so many drems to break. My aunt, uncle, his grandparents...Their lives were just revolving around him. Playing with him, teaching him, waiting for his arrival from school, mealtime conversations, investments, planning and what not! Now there is a huge emptiness.
The atmosphere in the school has become very upsetting. The student who used to share the desk with Aniket has not been told about his death. He keeps on asking everyone, "when is Aniket going to come back to school? He will get well soon na?"
I feel that the hospitals should consider having some training in human psychology. Just the medical treatments are not sufficient to cure some health problems, mental support is equally important.
One more factor that played a role in this accident is the age of the driver and cleaner. driver-cleaner of the "school-bus" were 20-24 year old. How can we expect them to be mature enough to handle such situations? Could they have enough seriousness to take actions when children were feeling uncomfortable/suffocated due to the smell of petrol? In appointing a driver for school-bus the level of maturity, affection towards children should be taken into consideration!
I really appreciate that the people who witnessed the incidence, immediately took actions to rescue the students and rush them to hospitals.
We should not keep combustible substances in the vehicles (a mistake which may unknowingly get committed)
Everybody, please think about this seriously!Wake up!!Life is valuable!!!

Tuesday, September 1, 2009

Namesake

जर आमच्या मांजरांच्या नावांची यादी कोणाला सांगितली तर "ही बापट मंडळी सिनेमाची न टी. व्ही. ची कमालीची शौकीन दिसतायत" असा विचार समोरचा माणूस करेल ह्याची मला हजार टक्के खात्री आहे! पण वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे...पण अशा मजेदार मुहुर्तान्वर त्या-त्या मांजरांनी आमच्या घरी एंट्री मारली की परिस्थितीने त्यांची ती-ती नावे ठेवायला आम्हाला भाग पाडले :D
आमच्याकडे आलेल्या एका पिल्लाचे नाव होते "नन्हे"...वयाने लहान असल्याने ह्या नामकरणाच्या वेळी माझे मत लक्षात घ्यायची तसदी कोणी घेतली नाही...खरे तर हे नाव मला अजिबात आवडले नव्हते....त्यामुळे हे नाव असे का ठेवले हे जाणून घ्यायची माझी इच्छा झाली नाही...
नन्हे नंतर अनेक वर्षे मांजरांची नावे त्यांना शोभतील अशी म्हणजे Sony, Blacky, Chocky आदि ठेवण्यात आली. पुढे Blacky च्या पोटी एका बोक्याने जन्म घेतला :D हा बोका करड्या रंगाचा होता...कधीही जवळ यायचा नाही न खंडणी वसूल करायला आल्याप्रमाणे फ़क्त दूध प्यायला घरी यायचा न जाता जाता घरातील इतर मांजरान्वर गुरगुरत जायचा, म्हणून त्याला लखन असे नाव दिले गेले :D
नंतर काही काळ Blacky, Chocky (Junior) ह्या नावांना मान दिला गेला :D न मग एंट्री मारली ढोलू आणि जादूने :D
ढोलू हा अतिशय furry, पांढराशुभ्र न धष्टपुष्ट असा लाडावलेला बोका होता...न त्याची बहीण जादू ही अतिशय रोड अशी भाटी होती. ड़-जीवन सत्त्वाअभावी मुडदूस झालेल्या बालकाचे चित्र एकदा विद्न्यानाच्या पुस्तकात होते, त्याची आठवण व्हायची तिला पाहिल्यावर...नवजात मूल जर रोगट असेल तर त्याचे नाव ठेवत नाहीत अशी पूर्वी प्रथा होती. ही जादू जगेल असेल वाटत नसल्याने सुरवातीला आम्ही तिचे नावच ठेवले नाही. पण तिने काही महिन्यात ज़रा बाळसे धरले. ह्याच वेळी आम्ही "कोई मिल गया पाहिला". त्यातील जादू ह्या Alien सारखी जादू तेव्हा दिसत असल्याचे सर्वांचे मत झाल्याने न ती आश्चर्यकारकरित्या जगाल्याने तिचे नाव जादू ठेवले :D
ह्याच सुमारास एक बोका आमच्याकडे आला. तो एकदम लाडिकपणे वागायचा ...बाबा पुजेला बसले की त्यांच्या खांद्यावर जाऊन बसायचा. मी अभ्यासाला बसले की मांडीत झोपायचा. तो एकदम लाडका होता आमचा..तो करडा होता.तेव्हाच दूरदर्शनवर "नंदू अपना" नावाचे animation लागायचे. त्यातला नंदू (हत्तीचे पिल्लू) न हा बोका ह्यांच्या character न रंगामध्ये कमालीचे साम्य होते...न त्याचे title song होते "सब का दुलारा नंदू अपना, सब का है प्यारा नंदू अपना " त्यामुळे बोक्याचे नाव नंदू ठेवले :D
जादुला दोन पिल्ले झाली (एक बोका न एक भाटी) तेव्हा "बंटी और बबली" हा सिनेमा गाजत होता ... बंटी न बबलीची जोड़ी आमच्या घरी पण धुमाकूळ घालू लागली... :D
पुढे बबलीला पिल्ले झाली (परत एक बोका न एक भाटी) तेव्हाच आम्ही "लगे रहो मुनाभाई" पाहिला...बोका खूप दंगा-मस्ती करायचा न भाटी दिसायला एकदम गोड न शांत अशी होती...सिनेमातल्या जान्हवी न मुन्नाशी बरोबरच्या त्यांच्या resemblance मुळे त्यांची नावे जानू न मुन्नू ठेवली...
पुढे जानूला एक जाड जूद, दाणगट, खोडकर असे पिल्लू झाले...त्याच्या देहाला मान देऊन त्याचे नाव मोटू ठेवले...
अजून एक अगदी डोळे न उघडलेले, चलाताही न येणारे, पांढर्या रंगाचे पिल्लू कोणीतरी आमच्या इथे सोडून गेले...ते आम्ही साम्भाळले ... ती भाटी होती... त्याच सुमारास आम्ही Black हा सिनेमा पाहिला... त्यातली छोटी Mischel असते तशीच ही मांजरी होती.. म्हणून तिचे नाव Mischel ठेवले..
ह्यानंतर मात्र आमच्याकडे नवीन मांजरांना प्रवेश न देण्याचे धोरण केले गेले....त्यामुळे t v तली पात्रे आमच्या घरी यायची बंद झाली :D

Thursday, August 13, 2009

सर्कस

स्थळ : बापटांचे घर
वेळ : अनिश्चित

ठळक वैशिष्ट्ये :
* ह्या सर्कशीत बहुतांश वेळा मांजरी न क्वचित कुत्री काम करतात
* सर्व खेळ उत्फ़ूर्तपणे (कोणतीही तयारी न करता) करण्यात कलाकारांचा हातखंडा आहे
* सर्व खेळ फुकट पाहता येतात

तुम्ही म्हणाल की काही निश्चित वेळ ठरलेली नाही तर आम्ही सर्कशीला यायचे कधी? लक्षात घ्या की ही सर्कस पाहण्यासाठी तुम्ही बापटान्चे शेजारी होणे गरजेचे आहे. ' बापटांच्या घरातील लोकांची हातात दोर्या, बादल्या आदि वास्तु घेऊन पळापळ सुरू होणे' हे सर्कस सुरु होणार असल्याचे लक्षण.

काय बोलतीये ही मुलगी? बरी आहे ना? आवरा........असे उद्गार मला ऐकू यायला लागलेत :D
आम्ही आजपर्यंत पाळलेल्या प्रत्येक मांजराने काही ना काही गमतीदार पराक्रम (:-o) केलेले आहेत. न त्यामुळे आमच्या शेजार्यांची, रस्त्यावरून येणार्या-जाणार्या लोकांची भरपूर करमणूक होत आलेली आहे.
आमच्याकडे मीनू नावाचा बोका होता. ३-४ महिन्यान्चाच असेल. आम्ही तेव्हा तिसर्या मजल्यावर रहायचो. मीनू लहान असल्याने कुत्र्यांनी त्याला मारण्याचा धोका होता. म्हणून आम्ही त्याला एकट्याला बाहेर पाठवायचे टाळत असू. पण बहुतेक त्याला असे घरात राहणे हा त्याच्या शौर्याचा अपमान वाटायचा. तो जाळीच्या दाराच्या फटींमधून, खिडकीतून, बाल्कनीतूनजिथून मिळेल तिकडून, गूपचूप खाली जायचा. पण खाली गेला की मग आमच्या ह्या शूरावीराला वाटायला लागायची भीती!
खाली एक गाडी अनेक वर्ष धूळ खात पडली होती. लोकांची ने-आण करण्यापेक्षा विविध प्राण्यांची, पार्किंगमध्ये खेळणाऱ्या मुलांची लपायची जागा बनून आहे तिथेच लोळत बसायला तिला आवडत असावे. ह्या गाडीला खाली इंजिन असते त्या ठिकाणी एक चौकोनी भोक होते (सगळ्याच गाड्यांना असू शकते पण ह्या गाडीला होते हे मिनुमुळे कळले) मीनू खाली गेला की तड़क ह्या भोकातून गाडीच्या इन्जिनात शिरायचा.
अचानक त्या गाडीला मिनूच्या तिकडे बसण्याचा कंटाळा येऊन तिने सुरु व्हायचे ठरवले असते तर? आशा न इतरही अनेक बालभित्यान्मुळे मिनुचे असे इन्जिनात जाऊन बसणे आम्हाला धोक्याचे वाटायचे.
मीनू घरात नाही हे ज्या क्षणी लक्षात येईल त्या क्षणी Rescue Operation ची तयारी सुरु होई. सुरुवातीला केवळ हाका मारून (प्रेमाने, धाकाने) काम चालावण्याचा प्रयत्न व्हायचा. पण तेवढ्याने ऐकेल तर तो मीनू कसला! मग दुकानातून एक अंडे आणावे लागायचे. ते उकडायचे, सोलायचे न खाली घेऊन जायचे. मग ते गाडीच्या त्या भोकापाशी नेऊन धरायचे. अंड्याचा वास आला की मिनुच्या तोंडाला पाणी सुटायचे न तो इन्जिनावरूनउतरून खाली येऊ लागायचा. मग अंडे सावकाश गाडीपासून दूर न्यायला लागायचे. मीनू गाडीच्या बाहेर यायचा. पण त्याला कल्पना असायची की हे आपल्याला पकडणार त्यामुळे अंडे चोरून पळ काढायचा तो प्रयत्न करायचा. कधीही आपल्याबरोबर दगाफ़टका होणार अशी जाणीव झाली तर परत गाडीत जाऊन बसायचा. त्यामुळे त्याला गनिमी काव्याने घरापर्यंत आणावे लागायचे. ते अंडे त्याच्या हाती लागणार नाही पण त्याला वास मात्र येत राहील आशा पद्धतीने धरून त्याला तिसऱ्या मजल्यापर्यन्तच्या पायऱ्या चढत वर घेऊन जायचे. अंडे पुढे, मीनू मागे अशी वरात चालायची.
आशा अनेक मनोरंजनात्मक कसरती मीनू (न आम्ही) केल्या...त्या लिहायला आत्ता वेळ नाहीये...परत वेळ मिळाला की अजून गमती सांगेन...
Note: The kitten in the snap is not Minu but he looked like it.

Tuesday, July 28, 2009

ही पोस्ट वाचू नका! :D

माझा मोबाइल बराच काळ विचित्रपणे वागत होता. वरची दोन बटने चालत नसल्याने Key Pad Unlock च होत नव्हते. त्यामुळे Messages लिहिणे अथवा वाचणे, Missed calls किती आहेत ते दिसले तरी ते कोणाचे आहेत हे बघणे, कोणाला Call करणे ह्यातली कोणतीच कृती करणे अशक्य होते. सुदैवाने हिरवे बटन चालत असल्याने फ़ोन तेवढा घेता येत होता. ज्या माणसाला फोनकडून एवढीच अपेक्षा असेल त्याला कसले बरे पडेल असे झाले तर...लोकांना सांगायला आयते कारण...फुकटात सगळी कामे होणार...पण दुर्दैवाने माझे तसे नव्हते. फोन ही गोष्ट किती गरजेची होऊन बसलीये हे तेव्हा जाणवले. असो, सांगायचा मुद्दा वेगळाच आहे. तर माझ्या मोबाइलच्या अशा वागण्याची मला सवय झाली होती. न ज्या दिवशी माझा मोबाइल दुरुस्त झाला त्या दिवशी असे झाले की मला जर Message आला किंवा जर Missed Call दिसला तर आता ह्यावर काहीतरी respond करायची गरज आहे अशी जाणीवच मला होत नव्हती. म्हणजे माझ्या मोबाइलच्या अशा विचित्र वागण्याची मला सवय झाली होती. मी न भक्ती मेसमध्ये गप्पा मारत होतो तेव्हा मी हे सगळे तिला सांगितले. ती म्हणाली की "कोणत्याही गोष्टीची आपल्याला लगेच सवय होते नाही का?"
हम्म...माणूस परिस्थितीला Adapt होतो त्याचेच हे अगदी साधे उदाहरण नाही का...

Wednesday, July 15, 2009

कभी खुद पे हंसा मैं और कभी खुद पे रोया

मेरी Laundry का एक Bill, एक आधी पढ़ी Novel
एक लड़की का Phone Number, मेरे काम का एक Paper
मेरे ताश से Heart का King, मेरा एक चांदी का Ring
पिछले सात दिनों में मैंने खोया
कभी खुद पे हंसा मैं और कभी खुद पे रोया

ह्या "Rock On!" च्या गाण्यात त्यातल्या Hero ला काय वाटले म्हणून त्याने हे गाने लिहिले माहित नाही पण त्याला कोणत्या परिस्थितीतून जावे लागल्याने असले गाणे सुचले असेल त्याची प्रचिती मात्र मला गेल्या काही दिवसांत आली :डी
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मी माझ्या नव्या रूम मध्ये शिफ्ट झाले. Bag मध्ये सामान भरायचे, Bag नवीन रूम मध्ये नेऊन ठेवायची, रिकामी करायची, ती घेऊन जुन्या रूम मध्ये जायचे, परत सामान भरून आणायचे, ओतायचे, परत भरायचे...असा प्रकार मी दिवसभर केला (माझ्याकडे एकच Bag असल्याने हा प्रकार करावा लागला). दोन वर्षांमध्ये आपण किती सामान आपण जमवून ठेवले आहे (न का?) ह्याची मला जाणीव झाली. शेवटी इतकी दमछाक झाली की जेवायला एक जीना उतरून मेस मध्ये जायचे त्राण अंगात उरले नाही. तशीच खुर्चीत पडले :D
दिवसभर Computer चे तोंड न पाहिल्याने चैन न पडायला सुरुवात झाली (ह्यावरून मी हाडाची Computer Engineer आहे हे Prove होते :D)..PC चे सगळे Wiring करून (Sysad असल्याचा एकच फायदा हा की इतर मुलीन्सारखे ह्या कामासाठी मला कोणावर अवलंबून रहायला लागत नाही :D) पीसी चे बटन ऑन केले. माझा पीसी ऑन होताना थोडा Problem देतो हे माहित असल्याने तो बटन दाबताच सुरु झाला नाही हे मी विशेष मनावर घेतले नाही. त्याला तसाच ठेऊन इतर सामान लावायला सुरुवात केली. दोन तासाने पाहिले तरी महाशय अजून बंदच. त्याच्याशी थोडी मारामारी केली की त्याला सुरु व्हायची अक्कल येते नेहमी त्यामुळे बरीच खुड्बुड केली..चालू झाला नाहीच..होइल चालू असे म्हणून परत सामानाची लावालाव सुरु केली.
३ तास झाले, ४ तास झाले...चालू व्हायचा पत्ता नव्हताच...

म्हणले ठीके रात्रभारात तरी चालू होईल, तोवर Mobile ने घरी बोलून घेऊ..पाहाते तर Mobile ची पहिली २ बटने काम करत नव्हती :( बहुधा Moisture चा परिणाम होता..ह्याचा परिणाम म्हणजे माझे Key Pad च Unlock होत नव्हते :( मग तो बंद केला, Battery काढली, परत घातली न चालू केला न परत lock होण्याआधी पटकन घरी फ़ोन लावून बोलून घेतले.
सकाळी उठाल्याबरोब्बर PC डोळ्यासमोर दिसला, तो आतातरी चालू झाला असेल ह्या आशेने मी बेड वरून त्याच्या दिशेने झेपच घेतली. पाहते तर अजूनही तो बंदच :( आता मात्र काहीतरी major problem आहे अशी माझी खात्री झाली. काय झाले असावे बरे? Motherboard ला problem असेल का? की SMPS गेला असेल? की शिफ्टिंगच्या गडबडीत wires सैल झाल्या असतील? बर्याच possibilities होत्या. रविवार होता. Vendors घरी सुट्टीचा आनंद घेत बसले असणार. अन शिवाय मीही Sysad आहे. Vendor ला उगाच २०० रुपये द्यायचे माझ्या पुणेरी स्वभावात मुळीच बसणारे नव्हते. आपणच PC दुरुस्त करायचा असा निश्चय केला. Sysad रूम मध्ये जाऊन, शोधाशोध करून एक SMPS मिळवला, तो PC ला बसवला, PC सुरु झाला नाही तो SMPS च खराब असणार असा निष्कर्ष काढला. परत Sysad रूम मधून दुसरा SMPS आणला ह्यावेळेस मात्र तो खराब नसल्याची आधीच खात्री केली :D तो आणून बसवला. पीसी चालू झाला :) :) एवढे करून निष्कार्ष हा निघाला की SMPS गेलाय :D दूसरा SMPS विकत आणला, बसवला, एकदाचा पीसी सुरु झाला. मी Sysad असल्याचा मला अभिमान वाटला :D
आता पीसी समोर बसले. न बोटे Key Board वरून चालवायला सुरुवात केली. पाहाते तर तोसुद्धा नीट काम करत नव्हता :( न माउस पण कसातरीच वागत होता :( मुम्बईच्या Moist हवेला शिव्या घालत घालत माउस उघडून स्वच्छ केला. नंतर Key Board उघडला. उलट्या दिशेने उघडल्याने त्याच्या Buttons वर असलेल्या सगळ्या टोप्या खाली पडून खोलीभर विखुरल्या. एकेक टोपी गोळा करून मोठ्या शिताफीने KEy Board वर परत बसवायाचा प्रयत्न केला. पण पत्त्यांचा बंगला तयार करायला जेवढी एकाग्रता लागते तेवढीच ह्याही कामासाठी गरजेची आहे हे लवकरच लक्षात आले. सगळ्या टोप्या काही केल्या जगाच्या जागी बसेनात. हे काही अपल्याने होणार नाही अशी खात्री पटल्यावर कोणाकडे एखादा जुना पुराणा spare Key Board आहे का ह्याच्या चौकश्या सुरु केल्या. सरते शेवटी एक key board मिळाला न माझा पीसी खर्या अर्थाने सुरु झाला.

दुसर्या दिवशी घरी जायचे होते. घरी वेळ छान गेला. परत येताना अजून एक Story घडली. प्रगतीने पुण्यापासून दादरला आले. आता लोकलचे टिकेट घ्यायचे न कांजूरला उतरायचे म्हणून जीना चढायला सुरवात केली. माझ्यासोबत IIT ची जी मुलगी होती ती म्हणाली अग आपल्याकडे दादरपर्यंतचे टिकेट आहे ना मग आता कांजूरला जायला टिकेटची गरज नाही. मी म्हणले "पण दिशा उलटी झालिये तर टिकेट लागणारच!" तर ती मला म्हणाली "नाही अगं, मी नेहमी तशीच येते. एकदा तर TC ने हेच टिकेट पाहून मला सोडलेही होते." तिने TC च्याच तोंडचे बोल सांगितल्याने माझी खात्री झाली न आम्ही तश्याच लोकल मध्ये बसलो. लोकल कांजूरला पोहोचली न आम्ही सुखरूप (?) उतरलो. कांजूर स्टेशनवर एकाही माणसाने कधी TC ला पाहिले असेल आहे का? paN त्यादिवशी TC aamachich वाट पाहात तिथे उभा होता. त्याने टिकेट मागितले, आम्ही प्रगतीचे टिकेट दाखविले,त्याने आम्हाला Control Room मध्ये येण्याचे आगत्यापूर्वक निमंत्रण दिले :D तो पुढे न आम्ही त्याच्या मागे अशी वरात निघाली. ह्या मुली मागच्या मागे पळणार तर नाहीत ह्या संशयाने तो पुन्हा पुन्हा पोलीस चोराकडे पाहात असावेत त्या नजरेने तो आमच्याकडे वलून वलून पहु लागला. लोकांची फुकटात Entertainment करण्याचे भाग्य मला लाभले. Control Room मध्ये नेऊन त्याने आमच्याकडे प्रत्येकी २५७ रुपये मागितले. आम्ही खूप समजावायाचा प्रयत्न केला की आम्ही मुद्दाम हे केलेले नाही, त्या आधीच्या TC ने सोदाल्याने आमचा गैरसमज झालाय पण तो काही केल्या तो ऐकेना. मी म्हणाले "माझ्याकडे एवढे पैसे नाहीत.(त्यादिवशी खर्च कड़की होती.)" तो म्हणाला पालकांना घेऊन यायला सांग. मी म्हणाले मी IIT त आहे. तो म्हणे मित्र-मैत्रिनिन्ना बोलावून घे. मी म्हणाले सगळे सुट्टीसाठी घरी गेलेत. तो म्हणे काहिःइ करा पैसे द्यायला लागतील. मी म्हणले "नाहिचेत तर कुठून आणू? तुम्हीच काय हवे ते करा..पैसे नाहीत माझ्याकडे!" शेवटी तो म्हणाला "ठीके मी एकीचाच दंड घेतो!" २५७ ऐवजी १२५ रुपयात सुटका झाल्याबद्दल देवाचे न त्या माणसाचे (मनातच)आभार मानत तिकडून पळ काढला. रूमवर आले न किल्लिसाठी Bag च्या खणात हात घातला तर काय किल्ली तिथे नव्हती. आता लक्षात आले की काही सामान घरी काढून ठेवले त्यासोबत किल्लीपण तिथेच राहिली :( हा प्रकार मी आधीही केला होता. त्यामुळे धडा शिकून रूमाला अशी वेळ परत आल्यास तोड़ता येईल असेच कुलूप लावले होते. खालून हातोडा आणला न कुलुप तोडले. IIT तूं बाहेर पडल्यावर काही काम नाही मिळाले तर आपल्याला इतर अनेक कामे करता येऊ शकतात ह्याची खात्री झाली :D

ह्यानंतर अनेक तर्हेच्या प्रोब्लेम्सनी मला त्रास दिला. पुण्याला नीट चालणारा Mobile इथे येताक्षणी चालेनासा झाला. सर्व बटने एकापाठोपाठ एक बंद पडत गेली. कोठेही दुरुस्त करून मिळाला नाही. आता फक्त हिरवे बटन चालू आहे. त्यामुळे निदान आलेला कॉल तरी घेता येतोय.
पोट बिघडले. Hostel चे अन्न खाऊन माणूस आणखी आजारी पडतो असा अनुभव आधीच आलेला होता. ORS तयार करून (पानी+ मीठ +साखर) न थोडासा भात ह्यांवर २ दिवस काढले. मेसमधे मिळालेला मऊ भात नेहमीच्या भाताहून जास्तच घट्ट असतो हेही समजले. हे कमी म्हणून की काय कानात एक फोड़ आला. तो मोठा मोठा होउन त्याने भयंकर रूप धारण केले. सतत कान थानाकू लागला. हे मैत्रिणीला सांगितले तर ती म्हणाली "मलाही असे झाले होते तर IIT च्या दवाखान्यातल्या डॉक्टरनी एक औषध दिले. ते घेतले की मला एकदम चक्कर यायला लागायची. न मी कुठे आहे मला समजायाचेच नाही.....xyz" पुढचे मला काही ऐकूच आले नाही. भीतीने गाळण उडाली. काही झाले तरी डॉक्टर कड़े जायचे नाही असे ठरवले. पण जर दुखणे वाढले तर काय? ह्या भीतीने मला ग्रासले. नशिबाने रात्री हा फोड़ आपोआप फुटला न कान दुखाय्चा थांबला :D आता पोटही नीट होते.

दुसर्या दिवशी दुपारी मेस मध्ये शालिनी भेटली. ती म्हणाली "अगं, दासान्पसून सावध रहा बरं का...मला आज Shivering होत होते म्हणून मी डॉक्टरकड़े गेले तर त्यानी मलेरिया असण्याची शक्यता व्यक्त केली न टेस्ट करायला सांगितल्या आहेत. आपल्या हॉस्टल मध्ये मलेरियाच्या अजून २ केसेस निघाल्या आहेत असे म्हणाले ते..." झाले माझा गेल्या काही दिवसांचा प्रकार लक्षात घेता आपल्याला तर काही झालेले नाही ना अशी भीत मला वाटायला लागली. मी रूमवर आले तर मला खूप थंडी वाजतीये असे मला वाटायला लागले (बाहेर पावासामुले खरच थंडी होती :D). मी लगेच पांघरू N घेऊन बेडवर आडवी झाले. अर्धवट झोप लागली. आपल्याला मलेरिया झाल्याची स्वप्ने पडू लागली. तासाभराने जेव्हा पूर्ण जागी होऊन नीट विचार केला तेव्हा आपल्याला काही झालेले नाही ह्याची समजूत मनाला घातली :D न थंडी वाजेनाशी झाली :D

ह्याक्षणी तरी सगळे काही ठीक चाललेले आहे. न काही दिवसांत घडलेल्या घटना आठवल्या की हसावे का रडावे ते काळात नाहीये :D

Sunday, July 12, 2009

प्राण्यांनाही मन असतं!

काल Lab ला जात असताना एका ओळखीच्या आवाजाने माझं लक्ष वेधलं. आवाज मांजरीच्या पिल्लाचा होता. आवाजाचा वेध घेत घेत निघाले न StaffC (Canteen) पर्यंत जाऊन पोहोचले. आवाज छपरावरून येत होता. staff C चं छप्पर एकदम बुटकं असल्याने सम्पूर्ण छपराचा एक scan मारला. तिथे अडगळ सोडून आणखी काहीच दिसलं नाही त्यामुळे तिथून निघणार एवढ्यात परत आवाज आला. आता अगदी निरखून पाहिल्यावर छपराच्या कोपर्याताल्या जाळीखाली काही तरी हलत असल्यासारखं वाटलं. अजून जवळ जाऊं पाहते तर एक अगदी छोटं (एखाद्या महिन्याचं असेल) मांजरीचं पिल्लू दिसलं. सुमारे ५ मिनिटं त्याला हाका मारल्यावर त्याला माझ्या सज्जनपणाची खात्री झाली न ते हळुहळू माझ्या जवळ आलं.
ते अतिशय भुकेजलं होतं. त्याच्या आवाजाची स्थिती पहाता ते खूप वेळापासून असंच ओरडत असणार हे स्पष्ट काळात होतं. शिवाय भूक न भीती ह्यांमुळे ते थरथर कापतही होतं. Canteen मध्ये त्याच्यासाठी आणायला गेले तेव्हा तिथले काका म्हणाले "दोन पिल्लांना इथे कोणीतरी दुपारी सोडून गेलं. एका पिल्लाला कुत्र्याने मारलं न आता हे उरलंय. इथे कुत्री येतात, बोके येतात. लोकं कशाला सोडून जातात इथे कोणास ठाऊक?"
दूध घेऊन गेले. बशीत ओतलं न पिल्लापुढे ठेवलं. त्याला बशीत दूध आहे हेच समजेना. शेवटी हाताच्या तळव्यावर चमचाभर दूध घेऊन हात त्याच्यासमोर धरला. आता त्याला दुधाचा वास आला न त्याने हातावरचं दूध चाटायाला सुरवात केली. असे २-३ चमचे दूध प्यायल्यावर त्याची भूक शांत झाली. Glass मधलं उरलेलं दूध पिऊन टाकण्यासाठी त्याच्या शेजारी बसले. तर ते मांडीत येऊन बसलं न एका मिनिटाच्या आत झोपूनही गेलं... त्याला सुरक्षित वाटत होतं. दूध संपवल्यावर ५ मिनिटं तशीच बसून राहिले. मनात विचार येऊ लागले "पिल्लू स्वतःचं संरक्षण करण्याइतकं मोठं नाही? ह्याच्या आईपसून तोडून सरळ आशा अयोग्य ठिकाणी ह्याला आणून सोडण्याचा निर्दयपणा कोणी कसं करू शकतं? शेवटी तो एक छोटासा जीव आहे. एखाद्या माणसाच्या बाळाला इतक्या सहज कोणी आईपसून दूर करू शकेल? मग प्राण्यान्शी माणसं अशी का वागतात? आता ह्या पिल्लाचं काय होईल?"
मी त्याच्यासाठी काहीही करू शकत नव्हते. एवढ्या मोठ्या IIT मध्ये प्राण्यांसाठी एकही जागा नाही. Hostel वर प्राणी पाळले तर मुलींना ते Unhiegienic वाटतं. अरे स्वच्छतेची फिकिर काय माणसांनाच असते?
एकदा एका अशाच एका पिल्लाला H-12 च्या इथे नेऊन सोडलं होतं. बरेच दिवस होतं ते तिथे. एक दिवस त्याला कुत्र्याने मारल्याचं कळलं. त्या पिल्लाबरोबर त्याची आई असती तर त्याच्या जिवाची तिने काळजी घेतली असती.
अजून एक अनुभव म्हणजे आमच्या हॉस्टलच्या पार्किंगमधे एक छोटं कुत्र्याचं पिल्लू आसर्याला येऊन बसायला लागलं. त्या गोंडस पिल्लाला पाहून अनेक मुलींनी येता-जाता त्याला खायला घालायला सुरवात केली. हळु-हळू ते आमच्या हॉस्टल मध्येच २४ तास राहू लागलं, मोठं होऊ लागलं. थंडीच्या काळात खाली मांडलेल्या खुर्चीवर हक्काने येऊन झोपू लागलं. कधी मेस मध्ये घुसू लागलं. आता मात्र मुलींमधली स्वच्छता जागी झाली. हॉस्टल कौंसिल ने फरमान काढलं की हॉस्टलच्या आवारात कुत्र्यांशी खेळताना आढळल्यास दंड भरावा लागेल. अचानकपणे त्या कुत्र्याला कोणी खायला घालेनासं झालं. हॉस्टलच्या परिसरात पाऊल ठेवताच त्या कुत्र्यावर Watchman धावून जाऊ लागला. येणार्या-जाणार्या प्रत्येक माणसाकडे ते कुत्र आशेने पाहत असतं. कोणीतरी आपल्याला खायला देइल, पाठीवरून पूर्वीसारखा हात फिरावेल.
रस्त्यातून एकदा जात असताना एका कुत्र्याच्या जिवाच्या आकांताने ओरडण्याचा मला आवाज आला. पाहाते तर Divider च्या समोर ते कुत्रं पडलं होतं. त्याच्या कम्बरेपासूनाचा सगळा भाग रक्ताबम्बाल झाला होता. त्याच्या अंगावरून गाडी गेली होती न गाडीवाला लक्ष न देता निघूनाही गेला होता. कुत्रं मोठं होतं. माझ्या एकटीच्याने उचललं जाणार नव्हतं. शिवाय मला कुत्र्यांची थोडी भीतीच वाटते त्यामुळे त्याला तिकडून हलवून रस्त्याच्या कडेला आणणे माझ्यासाठी अशक्य होतं. पण हेही स्पष्ट होतं की त्याला तसंच तिथे राहू दिलं असतं तर अजून एखादी गाड़ी अंगावर जाऊन ते मेलं असतं. माझा पाय पुढे हालेना. मी हताशपणे त्याच्याकडे बघत तिथेच उभी राहिले. येणारी जाणारी माणसं त्या कुत्र्याकडे बघून शोक व्यक्त करत पुढे जात होती. शेवटी एक रिक्शावाला थांबला. मी कुत्र्याकडे पाहात असलेलं पाहून त्याने माझ्याकडे कुत्र्याविषयी चौकशी केली. मी सगळी हकीकत सांगताच तो म्हणाला "इथे जवळच लिलाताई परुळेकर ट्रस्टचं कुत्र्यान्चं अनाथालय आहे तिकडे आपण ह्याला नेऊन सोडू." तो कुत्र्याला उचलून घेऊन आला. आम्ही त्याला घेऊन ट्रस्टमध्ये गेलो. लागलीच कुत्र्याला उपचार मिळाले.
"प्राण्यांनाही मन असतं" हे आपण का लक्षात घेत नाही? मांजरी आहे म्हणजे पिल्लं होणार. त्यांना तिच्यापासून तोडून वार्यावर सोडण्यापेक्षा एखादवेळेला तिला पिल्लं होऊ देऊन मग १००० रुपये खर्चून तिचे लसीकरण करून आणण्याइतका शहाणपणा माणसं का वापरत नाहीत? aapaN आत्ता ह्या कुत्र्याला खाऊ पिऊ घातले तर ते कायमचे इथे रहायला लागून पुढे त्यालाच इतरांच्या हाताचा मार खायला लागेल, त्यापेक्षा त्याला स्वतःचा दूसरा मार्ग शोधू दे , ही दृष्टी प्राण्यान्बाबत आपण का ठेवत नाही? माणसांच्या अंगावरून गाडी गेली तर त्यांना हॉस्पिटल मध्ये नेलं जातं (तेहि आता कमी होतंय) पण कुत्र्याचा जीव वाचवावा असं मात्र कोणालाच वाटत नाही.
माणसं माणूसकीने वागायला शिकणार का?

Saturday, June 27, 2009

Morning Raga

एक सुन्दर सकाळ...
लवकर उठले, भराभर आवरलं, आज गाण्याचा क्लास होता ..
hostel मधून बाहेर पाऊल ठेवलं न मन प्रसन्न झालं...
ओल्या मातीचा वास..हिरवगार गवत, झाडं...हवेतला ओलावा...खूप छान वाटायला लागलं...
एकेक पाऊल चालू लागले...कुठेतरी काहीतरी कमी आहे असं मन खुणावायला लागलं...
गेली दोन वर्षं ह्या रस्त्यांवरून चालताना कोणी ना कोणी माझ्यासोबत असायचं...आता सगळे चाललेत एकेक सोडून...लांब...रोज रोज ना दिसण्यासाठी...तशीच चालत राहिले...
एका कोपर्यावर एक धष्टपुष्ट बोका दिसला, सोनेरी रंगाचा. जोर जोरात ओरडत होता. भुकेला होता. रस्त्यात मांजर दिसलं की माझ्या नकळत माझ्या तोंडून त्याला हाक जातेच. त्याने थोडासा भाव खाल्ला न जवळ आला. माझ्या पिशवीचा वास घेतला आणि हिच्याकडे काहीही खायला नाहिये हे पाहून थोडा हिरमुसला झाला. मला थोडंसं वाईट वाटलं पण क्लासला उशीर होत होता त्यामुळे त्याला न त्याच्याशी खेळण्याच्या विचारांना मागे टाकून पुढे निघाले. एकटेपणालाही तिथेच सोडता आलं असतं तर कितीबरं झालं असतं.
५-१० मिनिटांत सरांच्या घरी पोहोचले. तंबोरा हातात घेतला न तारा छेडल्या. सुरांमध्ये काय जादू आहे. एका क्षणात जगच बदलून गेलं. माझे गाण्याचे सर, मी आणि "हिंडोल".. सरांनी अलवारपणे हिंडोल माझ्या मनात, गळ्यात उतरवला. एक तास म्हणता-म्हणता निघून गेला. तम्बोर्याच्या तारांवरचा हात काढला न मन परत त्या सुरेल स्वप्नातून बाहेर पडलं.आता परत तोच एकटा प्रवास..
चालता-चालता IIT च्या गेटपाशी पोहोचले, बस पकडली. बस सुरु झाली. खिडकीतून बाहेर पाहू लागले. मला फार आवडतं चालत्या बसच्या खिडकीतून बाहेर बघत बसायला पण आज सगळच नको वाटत होतं. प्रत्येक जागेशी जुळलेल्या आठवणी. तेव्हा सगळे मिळून केलेली मजा. रुसवे-फुगवे...चिड़वा- चिडवी. काही गोष्टी जगातल्या कोणत्याच दुकानात मिळत नाहीत. काळ त्यांना घेऊन येतो न तुम्हाला न विचारता घेऊन जातो, कायमसाठी...डोळे खिडकीबाहेर पाहत होते न मन कुठेतरी भलतीकडेच...
अचानक लहान मुलांच्या चिवचिवाटाने एकदम दचकले. पाहिलं तर बस शाळेच्या समोरच्या स्टॉपवर थांबली होती. न लहान मुलांचा गोंधळ चालला होता बस मध्ये शिरण्यासाठी... बसमध्ये चढण्यासाठी पास नाहीतर कूपन दाखवावं लागतं. ड्रायव्हरकाकांच्या नकळत आपल्याला बसमध्ये कसं शिरता येईल ह्यासाठी काही मुलांची ख़टपट चालली होती तर काही मुलांची खिड़कीजवळची जागा पकडायला. एक लहान मुलगी खालतूनच जोरात म्हणू लागली "सपना मेरे लिए जगा पकडके रख".. आतून ती सपना ओरडत होती "अरे जगा नाही है तो किधर से पकडू?" एक मुलगा दुसर्या मुलाला टपली मारत म्हणाला "ए आज माझा चांस आहे खिडकीत बसायचा, ऊठ! " दुसरा मुलगा म्हणाला "कुछ भी क्या! आज मेरी बारी है." पहिला म्हणाला "ज्यादा शाणपट्टी की ना तो मैडम को बोल देगा कल की आज तू बेंच के नीचे बैठ के डब्बा खा रहा था क्लास के टाइम!" असा गोंधळ ५ मिनिट अखंड चालू होता न अचानक सगळे आवाज थांबले...बस सुरु झाली. सगळी मुलं एकमेकांच्या कड़े पाहात होती. काही खिडकीची जागा मिळाल्याबद्दल एकदम संतुष्ट दिसत होती. काही ती नाही मिळाली म्हणून खिन्न झाली होती...ही शांतता टिकली २ मिनिट...परत गोंधळ सुरु...
बसच्या शेवटच्या बाकावर बसलेल्या मुलांनी बसच्या ओलसर खिडकीला नाकं चिकटवली न रस्त्याने येणार्या- जाणार्या लोकांना ती वाकुल्या दाखवायला लागली. तेवढ्यात त्यांच्यातला एक म्हणाला "ए बैठो नीचे ...ड्रायव्हरने अभी ब्रेक लगायाना तो गए सब के सब उप्पर!" result=> तो एकटाच खाली बसला न इतर मुलांनी आपला पराक्रम चालू ठेवला.
इकडे मुलींच्या वेगळ्याच गप्पा चाललेल्या होत्या. तुमच्या क्लासटीचर कोण? आज पिंकीच्या नव्या रिबिनी कश्या भारी दिसत होत्या... उद्या डान्सचा क्लास कधी आहे...
मला एकदम माझे शाळेतले दिवस आठवले. अगदी असच चालू असायचं आमचंही..परत एकदा लहान व्हावं असं वाटायला लागलं. ती १०-१५ मिनिटं जीवनाने रसरसलेली वाटली. Techonlogy च्या कोरडेपणाने गंजलेल्या भावनांना परत ओलावा मिळाला न आईचे शब्द आठवले "तुम्ही कितीही शिका, मोठे व्हा..आयुष्यात माणसं लागतातच." घरी होते, सतत कोणाची तरी सोबत होती तेव्हा ह्या वाक्यांचा खरा अर्थ न किम्मत कळली नाही. स्वतःचा अभ्यास, स्वतःचं जग, माज, न त्यात इतर सामान्य माणसांना नसलेली जागा...बास...
IIT ने Technogy शिवाय अनेक गोष्टी शिकवल्या त्यातली ही एक की "Technology/Career हे आयुष्य नाही. माणसं आहात, माणसासारखे वागा. आनंद द्या न घ्या. तेच खरं जीवन!"

Tuesday, June 16, 2009

Animals are beutiful people!


दुपारची वेळ होती. रस्ता उन्हाने तापला होता . अचानक कुत्र्याच्या पिल्लाच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. आवाज स्वयंपाकघराच्या दिशेने येत होता . पाहायाला गेले तर आई आधीच खिडकीतून आवाजाच्या दिशेने बघत होती . तिने एकअगदी छोटसं कुत्र्याचं पिल्लू मला दाखवलं. बिचारं भुकेपोटी जिवाच्या आकांताने ओरडत होतं. आईनी मला त्याला खाली parking मध्ये नेऊन खायला घालायला सांगितलं.
मी खाली जाईपर्यंत ते ट्रकखाली जाऊन बसलं होतं. मी ट्रकजवळ गेले, बसले, त्याला बोलावलं. पण ते खूपच लहान होतं. मी बोलवायचा प्रयत्न करतीये हे त्याला काही केल्या कळेना. शेवटी आपण आता इयत्ता पाचवीत नाही हे विसरून, पाय गुडघ्यावर टेकून, ट्रकखाली रांगत जाऊन त्याला बाहेर काढलं. कडेवर घेऊन घरी आणलं. खरं म्हणजे एखाद्या पिल्लाला (ते कोणत्याही प्राण्याचं असो) कडेवर उचलून आणणे ही किती अवघड, कसरतीची गोष्ट हे तसा प्रयत्न केलेला माणूसच समजू शकतो. पण ते पिल्लू इतकं थकलं न् भुकेजलेलं होतं की त्याने कोणताच प्रतिकार केला नाही.
त्याच्यासमोर आधी पोळी धरली. हा एक खाद्यपदार्थ आहे असं त्याला अजिबात न वाटल्यामुळे त्याने तोंड गच्च मिटून घेतलं. मग दुधाची बशी समोर ठेवली. त्याने वास घेतला न् हे काहीतरी सेवन करण्याजोगं आहे ह्याची खात्री करून एकदम भसकन बशीत तोंड घातलं. दूध नाकात गेलं. दोन-चार शिंका आल्या. मग बशीच्या कडांना तोंडाने चावून त्यातून काही मिळतंय का ते बघण्याचा प्रयत्न झाला. शेवटी अजून २-४ वेळा बशीत नाक बुडवून झाल्यावर बशीतून दूध कसं प्यायचं हे त्याला समजलं. पोटभर दूध पिऊन झाल्यावर जवळच असलेल्या बादलीच्या मागे ते गेलं, मोठा आळस दिला, न् पुढच्या पायांवर डोकं टेकवून ते झोपून गेलं.

हा सगळा घटनाक्रम माझ्यासाठी अजिबातच नवीन नाही. माझ्या लहानपणापासून आम्ही अनेक मांजरं पाळलेली आहेत . प्रत्येक मांजर घरी आल्यानंतर हाच सगळा प्रकार घडताना पाहिलेला आहे!
त्या पिल्लाला पाहून मला प्रत्येक मांजर घरात कसं आलं? त्याचं नाव आम्ही काय आणि तसं का ठेवलं? त्याच्या गमती-जमती असा सगळा इतिहास आठवला न् हा इतिहास ब्लॉगद्वारे इतरांनाही सांगावा असं वाटलं.
ह्या इतिहासातली पात्रं मोजायची म्हणलं तर संख्या २०-२५ च्या वर जाईल! तेव्हा इतिहास प्रचंड मोठा आहे न् मुख्य म्हणजे शालेय इतिहासासरखा तो कंटाळवाणा नाही :D तेव्हा पुढच्या काही पोस्ट्स मध्ये ह्या माझ्या मित्रांच्या गोष्टी सांगेन.
ज्यांना प्राणी आवडत नाहीत त्यांना Sorry न् एक (धमकीवजा) विनंती: त्यांनी त्या पोस्ट्स अजिबात वाचू नयेत (कारण माझ्या मांजरांबद्दल केलेली कोणतीही वाईट comment अजिबात खपवून घेतली जाणार नाही :D )

Monday, May 18, 2009

Jay ho!

Warning: अनेक वर्षांनी काहीतरी not-technical लिहायचा प्रयत्न करत असल्याने ह्या post मध्ये अनेक चुका आहेत. पण माझा patience संपायच्या आत ही post post (:D) कर अशी ताकीद डोक्याने दिल्याने जे आहे ते तसं present करत आहे. तेव्हा डोळे किंवा डोकं ह्यांना त्रास झाल्यास जबाबदारी घेतली जाणार नाही.
मी ठरवलं खरं की English मध्ये post लिहायच्या पण एक फार बोलकी घटना लिहाविशी वाटली. English मध्ये लिहायचा एक असफल प्रयत्न करूनही झाला. पण मला जे व्यक्त करायचं होतं ते तसं English मध्ये काही जमेना. त्यामुळे ही पोस्ट मराठीतून...असो ...
मी एकदा लोकलची वाट पाहात कांजुरमार्ग स्टेशनावर उभी होते. नेहमीप्रमाणे गोंधळ घालून, जायचंय त्याच्या उलट्या दिशेला तोंड करून उभी राहिल्याने एक लोकल सुटली होती. पुढची लोकल यायला भरपूर वेळ होता. आता काय करावं म्हणून इकडे-तिकडे पहायला लागले तर एक interesting वाटेल असं दृश्य दिसलं. एक आजीबाई , दोन-तीन मध्यमवयीन बायका विक्रीसाठी आणलेल्या वस्तू टोपलीत नीट लावत जमिनीवर बसलेल्या होत्या न् एक चाळीस-पन्नाशीतला माणूस जहागिरदारासारखा बाकड्यावर पसरलेला होता. त्याच्या बसण्याच्या style वरून त्याला काही उद्योग नसावा हे अगदी कळून येत होतं. त्यांच्या एकमेकांशी जोरजोरात काहीतरी गप्पा चालल्या होत्या. मला उत्सुकता वाटली. योगायोगाने Ladies डबाही अगदी ते बसले होते तिथेच येणार होता. मी कान देऊन त्यांचं बोलणं ऐकायला लागले.
आजीबाईंच्या टोपलीkiwi-fruits होती. गम्मत म्हणजे त्या त्यांना "कीव" असं म्हणत होत्या :D किम्मत मात्र प्रत्येकी २० रुपये होती. कान्जुर स्टेशनासारख्या ठिकाणी लोकांना किवी-फ्रूट माहीत असणे म्हणजे पौडावरच्या गणप्याला Angelina Jolie माहित असण्यासारखंच झालं :D काहीतरी नवीन फळ दिसतंय असा विचार करून येणारी-जाणारी लोकं मोठ्या उत्सुकतेने टोपलीतली Kiwi-fruits न्याहाळत होती, नाव आणि किम्मत विचारत होती. पण किम्मत सांगितली की त्यांचा चेहरा एकदम पडायचा आणि ती तिथून लगबगीने काढता पाय घ्यायची :D हा असा सगळा प्रकार बऱ्याच वेळापासून चालू असावा कारण आजीबाईंचा धीर हळुहळू सुटायला लागला. त्यांचा चेहरा अजूनच पडायला लागला. शेवटी तो मगाचपासून बाकड्यावर पसरलेला तो माणूस उठला न् आजीबाईंशेजारी जाऊन बसला. त्यांची टोपली त्याने स्वतःसमोर ओढून घेतली. एक माणूस चौकशी करू लागल्यावर तो त्याला म्हणतो कसा, "साहेब, इम्पोर्टेड आयुर्वेदिक माल आहे. बहुगुणी हा एकदम! सर्दी, ताप, खोकला कशावरही एकदम गुणकारी. शिवाय रक्तशुद्धीसाठी फक्कड़. मूळ किम्मत फ़क्त २५ रुपये आहे, बोहनीचा टाईम आहे म्हणून २० ला देतो. एकदा घेऊन पहाल तर परत डॉक्टरकडे पाय ठेवणार नाही तुम्ही!" माणूस एकदम कौतुकाने फ़ळाकड़े पाहू लागला आणि त्याचा हात लगोलग खिशाकडे जाऊन त्यातून पटकन दहाच्या दोन नोटा बाहेरही निघाल्या :D
आता मात्र त्या माणसाबद्दलचा आदर बायकांच्या डोळ्यांमधून ओसंडून वाहू लागला.
आता चिक्कुवाली बाई बोलायला लागली, "माझे चिक्कू काय पिकायचं नाव घेत नाहीत काही केल्या. एक दिवस वाट पाहिली, मग कार्बन भरून पाहिला... आता मात्र फेकून द्यायची वेळ आलीये." मी अवाक! आपण जे तयार चिक्कू म्हणून बाजारातून विकत घेतो ते कार्बन घालून पिकवलेले असतात? :-o
आता तो माणूस अगदी विद्वानाच्या अवेषात म्हणाला, "बाई एक काम करा. पुढच्या वेळपासून बोरीवलीहून चिक्कू घ्या, तान्दळात घालून ठेवा...एक दिवस थांबा न् मग बोला. चिक्कू चांगले नाही निघाले तर नाव बदलेन." हा सल्ला ऐकून मला जरा धीर आला :D नाहीतर अजून काय काय घालून फळ पिकवलं जातं हे ऐकून मला चक्करच आली असती.
आता मात्र हा माणूस भलताच हुशार दिसतोय अशी बायकांची खात्री पटली :D
तिसरी बाई बोलू लागली. तिला चार मुली होत्या न् एक मुलगा. बाई म्हणाली की ती धाकट्या मुलीसाठी पोस्टात पैसे टाकते दर महिन्याला. पण ह्यावेळी भरायला पैसे नव्हते. शिवाय चौथी मुलगी. फी माफी नव्हती. शाळेची फी भरण्यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न होता. हे ऐकून तो माणूस अतिशय शांतपणे म्हणाला "बाई कशाला इतकी दगदग करून घेता मुलीपायी. सरळ Remand Home मध्ये द्या पाठवून. जेवणा-खाणापासून सर्व सोय होईल . शिक्षण तिथेच होईल काय व्हायचं ते! " हे ऐकून मात्र मी थक्क झाले ...एखादा माणूस मुलीचा "खर्च" नको म्हणून तिला Remand Home मध्ये पाठवायचा सल्ला तिच्या आईला अगदी सहजतेने देऊ शकतो? एकदम cold bloodedly! त्या मुलीच्या आयुष्याचं काय? तिच्या बालपणाचं काय? तिच्या सुरक्षिततेची खात्री काय? आशा अनेक विचारांनी माझं मन पोखरायला सुरवात केली. मी सुन्न झाले एकदम. पुढचं काहीच ऐकू आलं नाही मला....
लेडीज डबा लगबगीने समोर येत "लवकर चढ़" असं ओरडला तेव्हा अचानक भानावर येऊन मी ट्रेन मध्ये चढले आणि Engine ने शिट्टी वाजवून आजचा "Slumdog Milleniore" चा show संपला असं जाहीर केलं!

Tuesday, May 5, 2009

My first blog!

I don't think myself as a person suitable for blogging! The reasons? here they are!!!
First of all, I find myself really lazy at writing, especially typing something...Chitchatting with somebody and irritating that person for hours sounds far more interesting and easier than this :)
The other thing is that I am not at all comfortable with expressing my thoughts in English...My English is not so good... I love Marathi. But, it is too boring to type a post in Marathi... Actually, I had started writing my first post in Marathi.... It made me tired literally!!!! Now, I don't have the courage to go back and complete that post!
The other language I love is Sanskrit :) But it would be 8th wonder of the world to write a blog in Sanskrit while having widespread Sanskrit illiteracy :D
The reason I am trying to write is because of consistent pushes from my friend Deepti. She feels that I have lots of stuff which I should share with people. I don't know if that is true, but being a Puneri, I don't hesitate in doing something which doesn't waste my money and time (It's vacation period)...So, here I am!
So let's see Why the name - "Puneri misal"? Misal is a mouth watering Maharashtrian dish! Kolhapuri misal is very very famous! It is really hot!! Puneri misal is not as famous as it should be :) It is not at all hot but medium spicy... It is a mixture of sweet, sour, a little spicy substances... My blog is going to be a Puneri misal... Nothing hot, nothing smart, but something from deep inside the heart! My misal will contain posts about music, dance, movies wo bhi real-life experiences ka tadka maar ke! Enough of putter putter for now...It's the time to serve the delicious misal made by me! Hope you all enjoy the taste!!!